शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

उमरगेकरांना आठ दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST

उमरगा : शहराला नगर पालिकेकडून सध्या सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, शहराला ...

उमरगा : शहराला नगर पालिकेकडून सध्या सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी येथील प्रकल्पावर ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने वीज पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

शहराला माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प तसेच कोरेगाव येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत; परंतु शहराला लागणारे बहुतांश पाणी माकणी येथील निम्न तेरणा धरणातून उचलले जाते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाणी गळती, विद्युत पुरवठा नियमित नसल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. सध्या सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, आठवड्यापूर्वी माकणी प्रकल्पातील जॅकवेलवरील ट्रान्स्फाॅर्मर जळाला असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. विशेष म्हणजे, अजूनही या ठिकाणी नवीन ट्रान्स्फाॅर्मर बसविले गेले नसल्याने वीज कनेक्शनवरून कमी दाबाने वीज पुरवठा मिळत असून, यामुळे आवश्यकतेच्या तुलनेत निम्मा पाणी उपसा केला जात आहे.

शहराला दरदिवशी ३८ लाख लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने १५ लाख लिटर पाणी तेरणा प्रकल्पातून उपलब्ध होते. याशिवाय पाच ते सहा लाख लिटर पाणी कोरेगाव धरणातून घेतले जाते. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच माकणी प्रकल्पातून पाणीपुरवठा करणारे पाईप अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने ते सातत्याने फुटत आहेत. यातून अधूनमधून गळती होत असल्याने पाणीपुरवठ्यात सातत्याने खंड पडत असून, परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

माकणी व कोरेगाव हे प्रकल्प तुडुंब भरलेले असतानाही पालिकेच्या नियोजनाअभावी शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही. शहराची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत असून, शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नवीन नळकनेक्शन मागणीचे प्रस्तावही वाढत आहेत; परंतु पालिकेकडून वाढत्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन नसून, उलट दैनंदिन नियमित पाणीपुरवठा करण्यातही अपयश येत असल्याचे दिसत आहे. तसेच गळतीवर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न होत नसून, लाखो रुपये खर्चूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप शहरवासीयांमधून केला जात आहे.

कोट.......

पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याच पाण्यावर आम्ही अवलंबून असून, सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे.

- सिद्धापा भोसले, नागरिक

सध्या नारंगवाडी उपकेंद्रावरून तेरणा धरणात पाणीपुरवठा करण्यात येतो. येथे विद्युत मोटारींना वीज कनेक्शन देण्यासाठी वेगळी वीज वाहिनी देण्यात आली आहे; परंतु या वाहिनीला ब्रेकर दिले नसल्याने वीज पुरवठा कमी-जास्त दाबाने होतो. त्यातच सध्या येथील ३३ केव्हीचे ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने आठवड्यापासून दुसऱ्या कनेक्शनवरून कमी प्रमाणात पाणी उपसा करीत आहोत; परंतु योग्य क्षमतेने पाणी उपसा करता येत नाही. त्यामुळे शहराला सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.

- रवींद्र सोनवणे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग