शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

उमरगेकरांना आठ दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST

उमरगा : शहराला नगर पालिकेकडून सध्या सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, शहराला ...

उमरगा : शहराला नगर पालिकेकडून सध्या सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी येथील प्रकल्पावर ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने वीज पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

शहराला माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प तसेच कोरेगाव येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत; परंतु शहराला लागणारे बहुतांश पाणी माकणी येथील निम्न तेरणा धरणातून उचलले जाते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाणी गळती, विद्युत पुरवठा नियमित नसल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. सध्या सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, आठवड्यापूर्वी माकणी प्रकल्पातील जॅकवेलवरील ट्रान्स्फाॅर्मर जळाला असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. विशेष म्हणजे, अजूनही या ठिकाणी नवीन ट्रान्स्फाॅर्मर बसविले गेले नसल्याने वीज कनेक्शनवरून कमी दाबाने वीज पुरवठा मिळत असून, यामुळे आवश्यकतेच्या तुलनेत निम्मा पाणी उपसा केला जात आहे.

शहराला दरदिवशी ३८ लाख लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने १५ लाख लिटर पाणी तेरणा प्रकल्पातून उपलब्ध होते. याशिवाय पाच ते सहा लाख लिटर पाणी कोरेगाव धरणातून घेतले जाते. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच माकणी प्रकल्पातून पाणीपुरवठा करणारे पाईप अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने ते सातत्याने फुटत आहेत. यातून अधूनमधून गळती होत असल्याने पाणीपुरवठ्यात सातत्याने खंड पडत असून, परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

माकणी व कोरेगाव हे प्रकल्प तुडुंब भरलेले असतानाही पालिकेच्या नियोजनाअभावी शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही. शहराची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत असून, शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नवीन नळकनेक्शन मागणीचे प्रस्तावही वाढत आहेत; परंतु पालिकेकडून वाढत्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन नसून, उलट दैनंदिन नियमित पाणीपुरवठा करण्यातही अपयश येत असल्याचे दिसत आहे. तसेच गळतीवर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न होत नसून, लाखो रुपये खर्चूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप शहरवासीयांमधून केला जात आहे.

कोट.......

पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याच पाण्यावर आम्ही अवलंबून असून, सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे.

- सिद्धापा भोसले, नागरिक

सध्या नारंगवाडी उपकेंद्रावरून तेरणा धरणात पाणीपुरवठा करण्यात येतो. येथे विद्युत मोटारींना वीज कनेक्शन देण्यासाठी वेगळी वीज वाहिनी देण्यात आली आहे; परंतु या वाहिनीला ब्रेकर दिले नसल्याने वीज पुरवठा कमी-जास्त दाबाने होतो. त्यातच सध्या येथील ३३ केव्हीचे ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने आठवड्यापासून दुसऱ्या कनेक्शनवरून कमी प्रमाणात पाणी उपसा करीत आहोत; परंतु योग्य क्षमतेने पाणी उपसा करता येत नाही. त्यामुळे शहराला सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.

- रवींद्र सोनवणे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग