शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जलसंधारणातून कोरेगाव बनले पाणीदार; लोकसहभागातून केली ५० लाखांची कामे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:09 IST

कामे लोकसहभागातून केल्याने येथे पावसाळ्यातील पाणी टिकवून ठेवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे़

- मारुती कदम 

उमरगा (जि़उस्मानाबाद) : एका बाजूला दुष्काळामुळे गावागावातील लोक हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकत असताना उमरगा तालुक्यातील कोरगाव मात्र, टंचाईपासून कोसो दूर आहे़ ही किमया गावाने साधलीय ती जलसंधारणातूऩ तब्बल ५० लाखांची कामे लोकसहभागातून केल्याने येथे पावसाळ्यातील पाणी टिकवून ठेवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे़

कोरगाव हे साधारणत: २ हजार लोकवस्तीचे गाव़ शेती हा इथला मुख्य व्यवसाय़ गावाशेजारीच साठवण तलाव् झाल्याने शेती आणखीच समृद्ध झाली़ सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे़ असे असतानाही सातत्याने कमी होत असलेला पाऊस लक्षात घेऊन इथल्या गावकऱ्यांनी एकत्र येत गेल्या काही वर्षांत जलसंधारणाची कामे हाती घेतली़ प्रकाश लवटे, लता बंडगर, दिलीप पांढरे, मनोहर बंडगर, सरपंच संजय बंडगर, उपसरपंच विश्वजीत खटके यांनी पुढाकार घेतला. सुमारे ५० लाख रुपयांची कामे करण्यात आली आहे़ गावाभोवलातून वाहणाऱ्या नाल्याचे सरळीकरण, खोलीकरण झाल्याने पावसाचे पाणी जागीच जिरविण्यात यश आले़ त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीची व बोअरची पातळी चांगलीच वाढली आहे 

परिणामी, आज सगळीकडे टंचाईच्या झळा बसत असतानाही कोरेवाडीत मात्र पाण्यासाठी वणवण दिसत नाही़ अगदी घरापर्यंत नळाने पाणी देण्यासाठी ग्रामस्थ विठ्ठल बंडगर यांनी दान दिलेल्या जागेत विहीर घेण्यात आली़ त्यासही मुबलक पाणी आहे़ आता पााणीपातळी खोलावत असल्याने शेजारच्या बोअरचे पाणी त्यात सोडले जात आहे़ हे पाणी नियमितपणे गावकऱ्यांना नळाद्वारे मिळते़ शिवाय, गावात तीन ठिकाणी सार्वजनिक जलकुंभ उभारुनही सोय करण्यात आली आहे़  इतकेच नव्हे सहा लाख रुपये खर्च करुन ग्रामपंचायतीने आरओ प्लांट उभारला आहे़ यातून नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी अल्पदरात दिले जात आहे़ 

मुख्यमंत्र्यांनीही केले अभिनंदऩ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मे रोजी दुष्काळी भागातील सरपंचाशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी कोरगावचे सरपंच संजय पाटील यांच्याकडून दुष्काळाची माहिती घेतली़ पाटील यांनी गावात पाण्याच सुकाळ असल्याचे सांगताच मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण गावाचे अभिनंदन केल्याचे पाटील यांनी सांगितले.

भारनियमनाचा अडसर  कोरेगाव शिवारात मुबलक पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे गावाचीओळख पाणीदार, अशी झाली आहे़ ग्रामस्थांना पुरविण्यासाठी आमच्याकडे भरपूर पाणी असले तरी त्यासाठी उच्च दाबाने वीज मिळत नसल्याने अडचण होत असल्याचे उपसरपंच विश्वजीत खटके यांनी सांगितले़

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद