शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

उस्मानाबादेत उष्माघाताचा बळी; उन्हात काम करुन पाणी पिताच शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 15:22 IST

काही वेळ विसावा घेण्याऐवजी लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले.

कळंब (जि. उस्मानाबाद) : सध्या उन्हाचा कडाका वाढलेला आहे. तापमानाचा पारा ४० अंशापार गेला आहे. अशा परिस्थितीत भर दुपारी उन्हात काम केल्याचा फटका कळंब तालुक्यातील हासेगाव केज येथील शेतकऱ्याला बसला. उन्हात काम करुन येताच पाणी प्यायल्याने या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. (farmer's death by sunstroke in Osmanabad) 

उस्मानाबाद जिल्ह्यात तापमान वाढीस लागले आहे. पारा ४० अंशाच्याही पुढे गेला आहे. अशातच तुळजापूरच्या कृषी हवामान केंद्राने कळंब तालुक्यात इतर ठिकाणाहून अधिक तापमान असण्याचा अंदाज वर्तविला होता. शेतकऱ्यांना उन्हात कामे न करण्याचा सल्लाही केंद्राकडून देण्यात आला होता. मात्र, हासेगाव केज येथील शेतकरी लिंबराज तुकाराम सुकाळे (५०) हे गुरुवारी दुपारी भर उन्हात शेतात काम करीत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तहान लागल्याने काम थांबवून ते पाण्याच्या ठिकाणी आले. काही वेळ विसावा घेण्याऐवजी सुकाळे हे लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. 

ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. सायंकाळी झालेल्या त्यांच्या शवविच्छेदन अहवालातही हा उष्माघाताचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले. लिंबराज सुकाळे हे यंदाच्या मोसमातील उष्माघाताचे जिल्ह्यातील पहिला बळी ठरले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीSun strokeउष्माघातOsmanabadउस्मानाबाद