शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

उस्मानाबादेत उष्माघाताचा बळी; उन्हात काम करुन पाणी पिताच शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 15:22 IST

काही वेळ विसावा घेण्याऐवजी लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले.

कळंब (जि. उस्मानाबाद) : सध्या उन्हाचा कडाका वाढलेला आहे. तापमानाचा पारा ४० अंशापार गेला आहे. अशा परिस्थितीत भर दुपारी उन्हात काम केल्याचा फटका कळंब तालुक्यातील हासेगाव केज येथील शेतकऱ्याला बसला. उन्हात काम करुन येताच पाणी प्यायल्याने या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. (farmer's death by sunstroke in Osmanabad) 

उस्मानाबाद जिल्ह्यात तापमान वाढीस लागले आहे. पारा ४० अंशाच्याही पुढे गेला आहे. अशातच तुळजापूरच्या कृषी हवामान केंद्राने कळंब तालुक्यात इतर ठिकाणाहून अधिक तापमान असण्याचा अंदाज वर्तविला होता. शेतकऱ्यांना उन्हात कामे न करण्याचा सल्लाही केंद्राकडून देण्यात आला होता. मात्र, हासेगाव केज येथील शेतकरी लिंबराज तुकाराम सुकाळे (५०) हे गुरुवारी दुपारी भर उन्हात शेतात काम करीत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तहान लागल्याने काम थांबवून ते पाण्याच्या ठिकाणी आले. काही वेळ विसावा घेण्याऐवजी सुकाळे हे लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. 

ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. सायंकाळी झालेल्या त्यांच्या शवविच्छेदन अहवालातही हा उष्माघाताचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले. लिंबराज सुकाळे हे यंदाच्या मोसमातील उष्माघाताचे जिल्ह्यातील पहिला बळी ठरले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीSun strokeउष्माघातOsmanabadउस्मानाबाद