शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ऑनलाइन गेम्सचे बळी! कर्जबाजारी तरुणाने पत्नी, मुलास विष पाजून स्वत:ला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:10 IST

शेती विकली, घर विकले तरी कर्जाच्या फेरा सुटत नसल्याने टोकाचे पाऊल

धाराशिव : डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर, फेडण्यासाठी पाठीशी काहीच शिल्लक नसल्याने नैराश्यात रुतलेल्या बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव (वय ३०) या तरुणाने पत्नी तेजस्विनी व दोन वर्षीय मुलगा शिवांश यांना विष पाजून स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. ऑनलाइन गेम्स तसेच शेअर मार्केटमध्ये नुकसान होऊन कर्ज झाल्याचा दावा त्याच्या आप्तेष्टांकडून करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याची पुष्टी केली नाही. तसा कयास असल्याचे स्पष्ट केले.

धाराशिव तालुक्यातील बावी येथील लक्ष्मण जाधव हा तरुण आपली पत्नी तेजस्विनी व शिवांश यांच्यासह पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला होता. लक्ष्मण हा जेसीबी, ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीत होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब एकत्र झोपले होते. दरम्यान, सोमवारी सकाळचे ११ वाजले तरी घरातून काही आवाज येत नव्हता. दारही उघडले नव्हते. लक्ष्मण बाहेर न आल्याने त्याच्या काही मित्रांनी घराकडे धाव घेतली. मात्र, आतून कडी लावलेली असल्याने व कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. पोलिस अधीक्षक रितू खोकर, ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती शेळके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी दार उघडून पाहणी केली असता तेजस्विनी व शिवांश बेडवर निपचित तर लक्ष्मण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या तिघांचेही मृतदेह एका वाहनातून पोलिसांनी धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जबाब घेण्याचे काम ग्रामीण पोलिसांकडून सुरू होते.

मन हेलावून टाकणारे दृश्यपोलिसांनी दार उघडून आत प्रवेश केल्यानंतर तेजस्विनी व शिवांश हे बेडवर निपचित पडले होते. त्यांच्या तोंडातून फेस आला होता, तर लक्ष्मण हा आडूला गळफास घेतलेला दिसून आला. हे दृश्य पाहिल्यानंतर नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

अडीच वर्षांपूर्वी केला प्रेमविवाहलक्ष्मण जाधव याचे गावातीलच तेजस्विनीसोबत प्रेम जुळले होते. यातूनच अडीच वर्षांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. यानंतर हे दोघे प्लॉटमध्ये पत्र्याचे शेड तयार करून त्यात वास्तव्य करीत होते. त्यांच्या संसारवेलीवर शिवांशरूपी फूल दोन वर्षांपूर्वीच उमलले.

शेती विकून फेडले २० लाख रुपयेलक्ष्मणवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. त्याच्या वाट्याला आलेले जवळपास चार एकर शेत विकून त्याने २० लाख रुपयांची परतफेड केली होती. पुन्हा कर्ज झाल्याने राहत्या प्लॉटचाही पाच लाखांत सौदा केला होता. तरीही कर्जाच्या फेरा सुटत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

प्रथमदर्शनी मयत तरुणाने पत्नी व मुलास विष देऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. प्राथमिक माहितीनुसार ऑनलाइन गेम्स, शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचे त्याचे आप्तेष्ट सांगत आहेत. मात्र, आम्ही त्याची या क्षणाला पुष्टी करीत नाही. तपासाअंतीच यातील खरे कारण समोर येऊ शकेल.- मारोती शेळके, पोलिस निरीक्षक, धाराशिव ग्रामीण

टॅग्स :dharashivधाराशिवDeathमृत्यूfarmer suicideशेतकरी आत्महत्या