शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्यासाठी किती मिळाली देणगी?; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन, Video पाहा
3
Pune Crime: "दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", पोलीस कर्मचाऱ्याच्या पोस्टने खळबळ
4
IndiGo Flights : 'इंडिगो'वर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, याचिकेत काय आहेत प्रवाशांच्या मागण्या?
5
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
6
Shocking: महागड्या फोनवरून वडिलांसोबत वाद; १७ वर्षीय मुलाची १४० फूट खोल बोअरवेलमध्ये उडी!
7
ट्रम्प यांनी दिलेला युद्धबंदीचा आदेश; अवघ्या ४५ दिवसांच मोडला! थायलंडचे कंबोडियावर हवाई हल्ले
8
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
9
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
10
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
11
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
12
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
13
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
14
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
15
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
17
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
18
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
19
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
20
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकाल : उस्मानाबादेत मुलीच अव्वल; मात्र निकालाचा टक्का घसरला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 17:26 IST

यावर्षी जिल्ह्याच्या निकाल ८२.७२ टक्के लागला 

ठळक मुद्देगतवर्षीच्या  तुलनेत यंदा ०़९२ टक्क्यांनी निकालात घट झाली प्रत्यक्ष परीक्षेला १५ हजार ६५९ परीक्षार्थी बसले होते

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ८२.७२ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या  तुलनेत यंदा ०़९२ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे़ यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०.३८ टक्के आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील १५ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. यामध्ये ८ हजार ७६० मुले तर ६ हजार ९८४ मुलींचा समावेश होता. प्रत्यक्ष परीक्षेला १५ हजार ६५९ परीक्षार्थी बसले असता, १२ हजार ९५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.७२ टक्के एवढे आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.९२ टक्क्यांनी निकालात घसरण झाली आहे. सर्वाधिक ८६.६२ टक्के निकाल उस्मानाबाद तालुक्याचा लागला आहे. तर भूमच्या निकालाचा आलेख घसरणीला लागला आहे. २०१८ च्या तुलनेत यंदा १.७९ टक्क्यांनी निकाल घटला आहे. जिल्हाभरातील १४२ पैकी सात कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला. तर परीक्षेला बसलेल्यापैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या कॉलजची संख्या एक एवढी आहे. शाखानिहाय निकाल पाहता विज्ञान शाखेचे सर्वाधिक ८८.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षण