शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्र्यांकडून केंद्र सरकारला घरचा आहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 13:47 IST

‘असेसमेंट करून रिक्त पदे भरायला हवीत’, अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकप्रकारे केंद्रातील भाजपा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सदरील विधान केले.

उस्मानाबाद : ‘असेसमेंट करून रिक्त पदे भरायला हवीत’, अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकप्रकारे केंद्रातील भाजपा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सदरील विधान केले.

केंद्रातील ‘एनडीए’ सरकारच्या काळात मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. केंद्राच्याच अहवालानुसार मागील दोन वर्षात अशा घटनांचे प्रमाण १७ वरून तब्बल २७ टक्क्यांवर पोहोचले आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेनंतर तर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे केंद्र आणि उत्तर प्रदेशातील राज्य सरकारच्या भूमिकेवर सर्वच स्तरातून सकडून टिका होत आहे. या निमित्ताने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या रिक्त पदांचा मुद्दाही चर्चेत आला आहे. मागासवर्गीयांवरील अत्याचारांत वाढ होत असतानाही रिक्त पदे भरण्याकडे का लक्ष दिले जात नाही, असा सवाल केला जाऊ लागला आहे. दरम्यान, केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या रिक्त जागांबाबत प्रश्न केला असता, ‘असेसमेंट करून पदे भरायला हवीत’, अशा शब्दात केंद्रातील भाजप सरकारला घरचा आहेर दिला. यावेळी त्यांनी शेतकरी कायद्याच्या अनुषंगाने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर सडकून टिका केली.  शेतकऱ्यांच्या  हिताचे त्यांना काहीही पडलेले नाही. ‘आमच्या मंडीत (बाजार समिती) आलेल्या शेतीमालाचे कमिशन आम्हाला मिळत नाही’, हे त्यांचे  खरे दुखणे  आहे’, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस व त्यांच्या सहयोगी पक्षांचा समाचार घेतला. पत्रकार परिषदेस आमदार सुजितसिंह ठाकूर, भागवत कराड,  भाजपा  जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारMarathwadaमराठवाडा