शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

केंद्रीय मंत्र्यांकडून केंद्र सरकारला घरचा आहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 13:47 IST

‘असेसमेंट करून रिक्त पदे भरायला हवीत’, अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकप्रकारे केंद्रातील भाजपा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सदरील विधान केले.

उस्मानाबाद : ‘असेसमेंट करून रिक्त पदे भरायला हवीत’, अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकप्रकारे केंद्रातील भाजपा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सदरील विधान केले.

केंद्रातील ‘एनडीए’ सरकारच्या काळात मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. केंद्राच्याच अहवालानुसार मागील दोन वर्षात अशा घटनांचे प्रमाण १७ वरून तब्बल २७ टक्क्यांवर पोहोचले आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेनंतर तर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे केंद्र आणि उत्तर प्रदेशातील राज्य सरकारच्या भूमिकेवर सर्वच स्तरातून सकडून टिका होत आहे. या निमित्ताने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या रिक्त पदांचा मुद्दाही चर्चेत आला आहे. मागासवर्गीयांवरील अत्याचारांत वाढ होत असतानाही रिक्त पदे भरण्याकडे का लक्ष दिले जात नाही, असा सवाल केला जाऊ लागला आहे. दरम्यान, केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे रविवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या रिक्त जागांबाबत प्रश्न केला असता, ‘असेसमेंट करून पदे भरायला हवीत’, अशा शब्दात केंद्रातील भाजप सरकारला घरचा आहेर दिला. यावेळी त्यांनी शेतकरी कायद्याच्या अनुषंगाने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर सडकून टिका केली.  शेतकऱ्यांच्या  हिताचे त्यांना काहीही पडलेले नाही. ‘आमच्या मंडीत (बाजार समिती) आलेल्या शेतीमालाचे कमिशन आम्हाला मिळत नाही’, हे त्यांचे  खरे दुखणे  आहे’, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस व त्यांच्या सहयोगी पक्षांचा समाचार घेतला. पत्रकार परिषदेस आमदार सुजितसिंह ठाकूर, भागवत कराड,  भाजपा  जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारMarathwadaमराठवाडा