शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अनियंत्रित दुचाकी उड्डाणपुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

By चेतनकुमार धनुरे | Updated: April 6, 2023 15:12 IST

सोलापूर-धुळे महामार्गावरून जात असताना तेरखेडा येथे असलेल्या उड्डाणपुलावर झाला अपघात

पारगाव (जि. धाराशिव) : वाशी तालुक्यातील पिंपळगाव (क) येथील दोन तरुण बुधवारी दुपारी दुचाकीने धाराशिवकडे निघाले होते. सोलापूर-धुळे महामार्गावरील तेरखेडा येथील उड्डाणपुलावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी कठड्यास धडकली. यामुळे दोन्ही तरुण पुलावरुन खाली कोसळले. यातील एकाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.

पिंपळगाव (क) येथील अविनाश हरिश्चंद्र जोगदंड (२०) व अक्षय संदीपान जोगदंड (२०) हे दोघे त्यांच्याकडील दुचाकीवरून (क्र. एमएच २५ एवाय ११५०) बुधवारी दुपारी धाराशिवच्या दिशेने निघाले होते. सोलापूर-धुळे महामार्गावरून जात असताना तेरखेडा येथे असलेल्या उड्डाणपुलावर वेगावर नियंत्रण न राहिल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. या धडकेमुळे दोन्ही तरुण उडून पुलाच्या खाली कोसळले. परिणामी, त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवून दिले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच जखमी अविनाश हरिश्चंद्र जोगदंड हा तरुण गुरुवारी सकाळी मृत्युमुखी पडला. तर अक्षय जोगदंड गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गुरुवारी येरमाळा ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद