शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नादुरूस्त ट्राॅलीला दुचाकी धडकली; काका पाठोपाठ जखमी पुतण्याचाही उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 18:43 IST

दुचाकीवरून लोकमंगल पेट्रोल पंपावर जात असताना रमणबाग जवळ नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली.

लोहारा  (जि.उस्मानाबाद ): नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला मंगळवारी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीने जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. मंगळवारी रात्री उस्मानाबाद येथे उपचारादरम्यान जखमी मुलाचा ही मृत्यू झाला आहे. या काका - पुतण्यावर राजोळ जि. गुलबर्गा, कर्नाटक येथे बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही घटना मंगळवारी सांयकाळी साडे सहाच्या सुमारास लोकमंगल कारखान्याजवळ घडली होती. 

याबाबत अधिक माहीती अशी की, सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू आहे. शहरातील लोकमंगल साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक सुरू आहे. परंतु अनेक वाहाने नादुरूस्त होऊन रस्त्यावरच उभी केली जात आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अर्जून रघू पवार (वय २०) व मेघनाथ पवार (वय १२ हे दोघे रा. राजोळ जि. गुलबर्गा, कर्नाटक) हे दोघे पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून लोकमंगल पेट्रोल पंपावर जात असताना रमणबाग जवळ नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. यात अर्जून पवार याचा जागीच मृत्यू झाला. तर मेघनाथ पवार हा गंभीर जखमी झाला. जखमींना युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, परवेज तांबोळी,निळकंठ कांबळे यांनी आपल्या स्वत:च्या वाहानातून लोहारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी अर्जून पवार याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. व मुलगा मेघनाथ यांच्या प्रथमोउचार करुन पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात हालविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना रात्री दहाच्या दरम्यान मेघनाथ पवार या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हे दोघे नात्याने काका पुतण्या आहेत.या दोघांची ही प्रेत त्यांच्या गावी राजोळ ( ता.अळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) येथे घेऊन गेले असून बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

पोट भरण्यासाठी आलो आणि मुलगा गमावलोकर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील राजोळ या गावातील पवार कुटूंबीय आपले पोट भरण्यासाठी लोहारा तालुक्यातील खेड पाटी जवळील विट्ट भट्टीवर काम करण्यासाठी आले होते. मंगळवारी विट्ट भट्टीवर काम करुन मोटार सायकलमध्ये पेट्रोल तर टाकून यावे म्हणून विट्ट भट्टीपासुन काही अंतरावरील लोकमंगल पेट्रोल पंपाकडे जात असता काळाने घाला घातला. आम्ही पोट भरण्यासाठी आलो आणि मुलगा गमावलो असे मयत अर्जूनचे वडील रघू पवार सांगत होते.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातOsmanabadउस्मानाबाद