शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नादुरूस्त ट्राॅलीला दुचाकी धडकली; काका पाठोपाठ जखमी पुतण्याचाही उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 18:43 IST

दुचाकीवरून लोकमंगल पेट्रोल पंपावर जात असताना रमणबाग जवळ नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली.

लोहारा  (जि.उस्मानाबाद ): नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला मंगळवारी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीने जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. मंगळवारी रात्री उस्मानाबाद येथे उपचारादरम्यान जखमी मुलाचा ही मृत्यू झाला आहे. या काका - पुतण्यावर राजोळ जि. गुलबर्गा, कर्नाटक येथे बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही घटना मंगळवारी सांयकाळी साडे सहाच्या सुमारास लोकमंगल कारखान्याजवळ घडली होती. 

याबाबत अधिक माहीती अशी की, सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू आहे. शहरातील लोकमंगल साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक सुरू आहे. परंतु अनेक वाहाने नादुरूस्त होऊन रस्त्यावरच उभी केली जात आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अर्जून रघू पवार (वय २०) व मेघनाथ पवार (वय १२ हे दोघे रा. राजोळ जि. गुलबर्गा, कर्नाटक) हे दोघे पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून लोकमंगल पेट्रोल पंपावर जात असताना रमणबाग जवळ नादुरूस्त होऊन रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला त्यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. यात अर्जून पवार याचा जागीच मृत्यू झाला. तर मेघनाथ पवार हा गंभीर जखमी झाला. जखमींना युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, परवेज तांबोळी,निळकंठ कांबळे यांनी आपल्या स्वत:च्या वाहानातून लोहारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी अर्जून पवार याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. व मुलगा मेघनाथ यांच्या प्रथमोउचार करुन पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात हालविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना रात्री दहाच्या दरम्यान मेघनाथ पवार या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हे दोघे नात्याने काका पुतण्या आहेत.या दोघांची ही प्रेत त्यांच्या गावी राजोळ ( ता.अळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) येथे घेऊन गेले असून बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

पोट भरण्यासाठी आलो आणि मुलगा गमावलोकर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील राजोळ या गावातील पवार कुटूंबीय आपले पोट भरण्यासाठी लोहारा तालुक्यातील खेड पाटी जवळील विट्ट भट्टीवर काम करण्यासाठी आले होते. मंगळवारी विट्ट भट्टीवर काम करुन मोटार सायकलमध्ये पेट्रोल तर टाकून यावे म्हणून विट्ट भट्टीपासुन काही अंतरावरील लोकमंगल पेट्रोल पंपाकडे जात असता काळाने घाला घातला. आम्ही पोट भरण्यासाठी आलो आणि मुलगा गमावलो असे मयत अर्जूनचे वडील रघू पवार सांगत होते.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातOsmanabadउस्मानाबाद