शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भाजीपाला विक्रीस नेणाऱ्या दुचाकीस्वार शेतकऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 18:22 IST

तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील घटना

ठळक मुद्देया अपघातात शेतकरी भिमाशंकर सुरवसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

तुळजापूर : भरधाव ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४८ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील बसवंतवाडी पाटीनजीक घडली.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकरी भिमाशंकर रामचंद्र सुरवसे (वय ४८) हे गुरूवारी सकाळी दुचाकीवरून (क्र. एमएच. २५/एएच. ०७२०) अणदूर येथील भाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात होते. साधारपणे सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील बसवंतवाडी पाटीनजीक आली असता, तुळजापूरहून नळदुर्गकडे निघालेल्या भरधाव ट्रकने (क्र. टीएन. ५२/एफ. ८४९३) दुचाकीला जोराची धडक दिली. 

या अपघातात शेतकरी भिमाशंकर सुरवसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तातडीने तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद