शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

तुळजापूरला अवकाळीने झोडपले;काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 10:54 IST

ज्वारीसह गव्हाचे मोठे नुकसान

ठळक मुद्देहातचे पीक गेल्याने शेतकरी हवालदिल

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील काढणीला आलेल्या व काढणी सुरू असलेल्या ज्वारीसह गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगरूळ सर्कलमध्ये सर्वाधिक 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

तुळजापूर तालुक्यात सध्या ज्वारी तसेच गव्हासह रबीच्या अन्य पिकाची काढणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांची काढलेली पिके शेतातच आहेत. असे असतानाच मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मंगरूळ महसूल मंडळात (सर्कल)  सर्वाधिक 45 पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच मंडळात झाल्याचे शेतकरी सांगताहेत. सावरगाव आणि इटकळ याही सर्कलमध्ये पाऊस झाला. येथे अनुक्रमे 19 व 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुळजापूर, नळदुर्ग, जळकोट आणि सलगरा (दि.) या सर्कलमध्ये मात्र दखलपात्र पाऊस झालेला नाही. त्यामुळे उपरोक्त सर्कलमध्ये पिकांचे फारसे नुकसान झाले नसल्याचे समजते.

द्राक्ष बागांनाही फटका...तुळजापूर तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकरी परदेशात द्राक्ष निर्यात करतात. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या साथीमुळे द्राक्ष निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल दराने द्राक्ष विक्री करीत असतानाच आता अवकाळीने झोडपले. त्यामुळे शेतकरी अधिकच्या संकटात सापडले आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी