शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

तुळजापूरला अवकाळीने झोडपले;काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 10:54 IST

ज्वारीसह गव्हाचे मोठे नुकसान

ठळक मुद्देहातचे पीक गेल्याने शेतकरी हवालदिल

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील काढणीला आलेल्या व काढणी सुरू असलेल्या ज्वारीसह गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगरूळ सर्कलमध्ये सर्वाधिक 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

तुळजापूर तालुक्यात सध्या ज्वारी तसेच गव्हासह रबीच्या अन्य पिकाची काढणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांची काढलेली पिके शेतातच आहेत. असे असतानाच मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मंगरूळ महसूल मंडळात (सर्कल)  सर्वाधिक 45 पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच मंडळात झाल्याचे शेतकरी सांगताहेत. सावरगाव आणि इटकळ याही सर्कलमध्ये पाऊस झाला. येथे अनुक्रमे 19 व 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुळजापूर, नळदुर्ग, जळकोट आणि सलगरा (दि.) या सर्कलमध्ये मात्र दखलपात्र पाऊस झालेला नाही. त्यामुळे उपरोक्त सर्कलमध्ये पिकांचे फारसे नुकसान झाले नसल्याचे समजते.

द्राक्ष बागांनाही फटका...तुळजापूर तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकरी परदेशात द्राक्ष निर्यात करतात. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या साथीमुळे द्राक्ष निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल दराने द्राक्ष विक्री करीत असतानाच आता अवकाळीने झोडपले. त्यामुळे शेतकरी अधिकच्या संकटात सापडले आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी