शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तुळजापूर, कळंब तालुक्यांना जानेवारीतच पाणी ‘टंचाई’च्या झळा !

By राजकुमार जोंधळे | Updated: January 10, 2024 16:49 IST

७८ गावांची तहान अधिग्रहणावर : २३ काेटींचा टंचाई कृती आरखडा...

धाराशिव : जिल्ह्यातील आठही तालुक्यांना जानेवारीतच टंचाईच्या ‘झळा’ सहन कराव्या लागत आहेत. तुळजापूर अन् कळंब तालुक्यांतील गावे टंचाईने सर्वाधिक ‘बेजार’ आहेत. जिल्ह्यात सध्या एकूण ७८ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान जाणवणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी १,८८८ उपाययाेजनांची आखणी केली आहे. त्यासाठी २३ काेटी ७ लाख ५५ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.

जानेवारी ते मार्च या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यांत टंचाईग्रस्त गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी जवळपास २५० टॅंकरची गरज भासणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जानेवारी महिन्यातच संभाव्य टंचाई कृती आराखडा आखला आहे. ज्या गावांच्या घशाला काेरड पडली आहे, अशांसाठी तातडीने उपाययाेजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दाेन तालुक्यांची पाण्यासाठी भटकंती...धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि कळंब तालुक्यांची घाेटभर पाण्यासाठी हिवाळ्यातच भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांपैकी सर्वाधिक तुळजापूर - ३२ आणि कळंब तालुक्यात २८ विंधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे. वाशी-परंडा प्रत्येकी १, धाराशिव-भूम प्रत्येकी २, लाेहारा - ८ आणि उमरगा तालुका ४ विंधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

टंचाई निवाराणासाठी १ हजार ८८८ याेजना...टंचाईग्रस्त गावांसाठी नऊ प्रकारच्या उपाययाेजनांची आखणी केली असून, यात बुडक्या घेणे - ७, विहिरीतील गाळ काढणे - २७, खासगी विहिरींचे अधिग्रहण - १ हजार ८८, टॅंकर, बैलगाडीने पाणीपुरवठा - ४९३, प्रगतिपथावरील पाणीपुरवठा याेजनांची कामे पूर्ण करणे - ०, नळयाेजनेची दुरुस्ती - १, विंधन विहिरींची दुरुस्ती - ४६, नवीन विंधन विहिरी, कूपनलिका - १८१ आणि तात्पुरत्या ४५ पूरक नळयाेजनांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील टंचाईवर २३ काेटींचा हाेईल खर्च...जिल्ह्यातील संभाव्य टंचाई दूर करण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने २३ काेटी ७ लाख ५५ हजारांचा खर्च केला जाणार आहे. यात खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी - ५ काेटी ३६ लाख ३ हजार; टँकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९ काेटी ६६ लाख १ हजार; नवीन विंधन विहिरी घेणे, कूपनलिकेसाठी २ काेटी ५२ लाख ५० हजार आणि तात्पुरत्या पूरक नळयाेजनांसाठी ४ काेटी ५६ लाख ९१ हजारांची तरतूद आहे.

टॅग्स :WaterपाणीOsmanabadउस्मानाबाद