शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

काक्रंबा-किलज मार्गावर दणक्यात प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:26 AM

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष तुळजापूर : ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावरील डांबर व ...

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

तुळजापूर : ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावरील डांबर व गिट्टी उखडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, अशीच परिस्थिती तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा ते किलज या रस्त्याचीही झाली आहे.

काक्रंबा ते किलज हा जवळपास २५ ते ३० किमी अंतराच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे सध्या अक्षरश: चाळण झाली आहे. परिणामी, हा मार्ग अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, चारचाकी, एसटी बस चालकांना वाहने चालविताना खड्डे चुकावत मार्ग काढावा लागत असून, काही वेळा अपघातही घडले आहेत, तसेच खड्ड्यामुळे प्रवाशांना मणक्याच्या आजारांसह इतर आजाराला सामोरे जावे लागत आहे.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथून होनाळा, बारूळ, जवळगा (मे), वानेगाव, वडगाव देव, सलगरादी, किलजरून हा रस्ता पुढे जातो. या मार्गावरील जवळपास २५ ते ३० किमी अंतरावरात दर पाच, दहा फुटांवर खड्डे पडल्याचे दिसून येते. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची माती वर आली असून, वाहनचालक, दुचाकी चालकांना वाहने चालविताना ‘नजर हटी दुर्घटना घडी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही दुरवस्था कायम असून, प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

दर्शनासाठी गर्दी

काक्रंबा-किलज मार्गावर तालुक्यातील जवळगा (मे) येथे जागृत देवस्थान मेसाईचे मंदिर आहे. येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविकांची देवी दर्शन, नवसपूर्ती कऱण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर भाविकांच्या वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह भाविकांनाही रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे.

पूलही खचला

जवळगा (मे) मार्गावरी होनाळा गवानजीक असलेला नदीचा पूलही खचला असून, या पुलावर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा उतराला असून, तो बुजविण्यात आला नसल्याने रात्री या खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे यातून अपघात घडत आहेत.

रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने, वाहने खिळखिळी होत आहेत. अनेकांना पाठीचा, मणक्याच्या त्रास उद्भवत आहे. सध्या शेतकऱ्यांची ऊसतोड सुरू असून, या मार्गावर ऊस वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः खड्डे बुजवावे लागत आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याची ही दुरवस्था कायम असताना प्रशासन मात्र याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.

- अमोल जेटीथोर, ग्रामस्थ, वाणेगाव