शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

काक्रंबा-किलज मार्गावर दणक्यात प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष तुळजापूर : ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावरील डांबर व ...

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

तुळजापूर : ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावरील डांबर व गिट्टी उखडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, अशीच परिस्थिती तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा ते किलज या रस्त्याचीही झाली आहे.

काक्रंबा ते किलज हा जवळपास २५ ते ३० किमी अंतराच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे सध्या अक्षरश: चाळण झाली आहे. परिणामी, हा मार्ग अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, चारचाकी, एसटी बस चालकांना वाहने चालविताना खड्डे चुकावत मार्ग काढावा लागत असून, काही वेळा अपघातही घडले आहेत, तसेच खड्ड्यामुळे प्रवाशांना मणक्याच्या आजारांसह इतर आजाराला सामोरे जावे लागत आहे.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथून होनाळा, बारूळ, जवळगा (मे), वानेगाव, वडगाव देव, सलगरादी, किलजरून हा रस्ता पुढे जातो. या मार्गावरील जवळपास २५ ते ३० किमी अंतरावरात दर पाच, दहा फुटांवर खड्डे पडल्याचे दिसून येते. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची माती वर आली असून, वाहनचालक, दुचाकी चालकांना वाहने चालविताना ‘नजर हटी दुर्घटना घडी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही दुरवस्था कायम असून, प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

दर्शनासाठी गर्दी

काक्रंबा-किलज मार्गावर तालुक्यातील जवळगा (मे) येथे जागृत देवस्थान मेसाईचे मंदिर आहे. येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविकांची देवी दर्शन, नवसपूर्ती कऱण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर भाविकांच्या वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह भाविकांनाही रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे.

पूलही खचला

जवळगा (मे) मार्गावरी होनाळा गवानजीक असलेला नदीचा पूलही खचला असून, या पुलावर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा उतराला असून, तो बुजविण्यात आला नसल्याने रात्री या खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे यातून अपघात घडत आहेत.

रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने, वाहने खिळखिळी होत आहेत. अनेकांना पाठीचा, मणक्याच्या त्रास उद्भवत आहे. सध्या शेतकऱ्यांची ऊसतोड सुरू असून, या मार्गावर ऊस वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः खड्डे बुजवावे लागत आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याची ही दुरवस्था कायम असताना प्रशासन मात्र याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.

- अमोल जेटीथोर, ग्रामस्थ, वाणेगाव