शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

तुळजापुरात तीन दिवस नो एंट्री; कोजागिरीची गर्दी रोखण्यासाठी जिल्हाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 7:27 PM

Next three days no entry in Tuljapur : शारदीय नवरात्र महोत्सवातील कोजागिरी पौर्णिमेस तुळजापुरात सर्वात मोठी यात्रा भरत असते.

उस्मानाबाद : काजागिरी पौर्णिमेला तुळजापुरात मोठी यात्रा भरते. या यात्रेला सुमारे ८ ते १० लाख भाविक जमत असतात. ही गर्दी टाळण्यासाठी यंदा मंदिर प्रशासनाने यात्राच रद्द केली आहे, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत ( Next three days no entry in Tuljapur) जिल्हाबंदी लागू केली आहे. त्यामुळे तीन दिवस तुळजापूर किंबहुना जिल्ह्यातच कोणत्याही नागरिकांना नो एंट्री असणार आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवातील कोजागिरी पौर्णिमेस तुळजापुरात सर्वात मोठी यात्रा भरत असते. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा यावेळी रद्द करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. १९ व २० ऑक्टोबरला असलेल्या या पौर्णिमेच्या दिवशी राज्यातीलच नव्हे, तर शेजारच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्यातील भाविकांची सर्वाधिक वर्दळ असते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत, तर पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी अवजड मालवाहतुकीच्या वाहनांना तुळजापूर मार्ग बदलून अन्य मार्गे वाहतूक वळविण्याचे आदेश दिले आहेत. १८, १९ व २० ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यात, तसेच तुळजापुरातही केवळ रुग्णसेवा, पोलीस, अग्निशमन, एसटी व अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी किंवा इतरही प्रवाशांनी तीन दिवसांसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.वाहतूक मार्गात बदल...दरम्यान, वाहनांना प्रवेशबंदी असली, तरी आडवाटेने पायी येणारे भाविक जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. उस्मानाबादहून हैद्राबादकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना औसा-उमरगा मार्गाचा पर्याय दिला आहे. औरंगाबादहून हैद्राबाद जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना मांजरसुंबा-लातूर-उमरगा मार्ग, उस्मानाबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना वैराग मार्ग, लातूर ते सोलापूरसाठी बार्शी-येडशी-मुरुड मार्ग, तर औरंगाबाद ते सोलापूरसाठी येरमाळा-बार्शी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद