शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गूढ आवाजाने पंधरा दिवसातून तिसऱ्यांदा उस्मानाबाद जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:14 IST

उस्मानाबाद जिल्ह्यात गूढ आवाजाचा पुन्हा हादरा 

ठळक मुद्देपंधरा दिवसांतील तिसरी घटना  आवाजाने नागरिकांमध्ये भीती

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या काही भागात सातत्याने जोरदार आवाज होऊन त्याचा जबर हादरा बसत आहे़ या आवाजाचे गूढ उकलण्यात अजूनही प्रशासनाला यश आले नाही़ मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब तालुका परिसर या आवाजाने पुन्हा हादरला़

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांमध्ये तीनवेळा जोरदार आवाजाचा हादरा नागरिकांना बसला आहे़ मंगळवारी दुपारी १ वाजून ३७ मिनिटाला हा गूढ आवाज झाला़ या आवाजाने कळंब तालुक्यातील इटकूरसह इतर गावे तसेच भूम तालुक्यातील ईट, भूम शहर व परिसर, परंडा तालुक्यातील जवळासह अन्य गावांमध्ये या आवाजाची तीव्रता जाणवली़ जोरदार आवाजामुळे घरावरील पत्रे, तावदाने आदळली़ असे आवाजा जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सातत्याने होत आहेत़ या आवाजाची नोंद ही भूकंपमापन केंद्रातही होत नाही़ शिवाय, यावर नागपूरच्या ‘जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून दोनवेळा अभ्यास करण्यात आला आहे़ मात्र, कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत प्रशासनाला पोहोचता आलेले नाही़ 

ठोस कारण अजूनही समजले नाहीभूगर्भातील पाण्याचा स्तर खालावू लागल्यानंतर निर्माण होणाऱ्या पोकळीतील हवा ही एखाद्या बोअरच्या किंवा अन्य छिद्राच्या माध्यमातून बाहेर पडते, तेव्हा असा आवाज होतो, असेच स्पष्टीकरण बहुतांश वेळा उस्मानाबाद जिल्ह्यात सातत्याने होणाऱ्या या आवाजाबाबत मिळते़ दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा एकदा यावर सर्वेक्षण झाले आहे़ मात्र, त्याचा अहवाल अजून तयार झाला नसल्यामुळेही ठोस कारण समोर येऊ शकलेले नाही़

टॅग्स :Earthपृथ्वीOsmanabadउस्मानाबाद