शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

उन्हं वाढलं, फळ बाजार बहरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:30 AM

उस्मानाबाद : थंडीचा कडाका संपल्यानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने बाजारात ...

उस्मानाबाद : थंडीचा कडाका संपल्यानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने बाजारात शरिराला थंडावा देणारी टरबूज, खरबूज, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू आदी फळे दाखल झाली आहेत. कोरोनाच्या धास्तीने सध्या या फळांना मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

घशाला कोरड पाडणार्‍या उष्णतेत थोडा गारवा मिळावा व आरोग्य थंड व्हावे, म्हणून उन्हाळ्यात फळांना मोठी मागणी असते. ग्रीष्मकालीन ऋतूमध्ये फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून फळविक्रेते बाजारात खरबूज, टरबूज, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, चिकू, संत्रा अशी फळे विक्रीस घेऊन येत असतात. या वर्षी मागील महिन्यापासून बाजारात पाणीदार उन्हाळी फळे दाखल झाली आहेत. थंडीमुळे या फळांना मागणी नव्हती. दोन तीन दिवसांपासून उन्हं वाढू लागले आहे. मात्र मागील दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने बाजारात ग्राहकांची संख्या रोडावली आहे. शिवाय, बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला अशा आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्या फळांना मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, येत्या काही दिवसांत फळांना मागणी वाढेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत तर टरबूज, खरबूज, चिकू ही फळे स्वस्त आहेत.

प्रतिक्रिया...

उन्हं वाढल्याने बाजारात पाणीदार फळे दाखल झाली आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने बाजारात ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे फळांना म्हणावी तशी मागणी नाही.

रईस बागवान, फळ विक्रेते

असे आहेत फळांचे दर

बाजारात सफरचंद १२० ते १८०, डाळिंब १६० ते २००, मोसंबी १००, संत्रा ६० ते ८० रुपये, द्राक्ष ५० ते ६०, चिकू ३० ते ४०, खरबूज ३० ते ४० रुपये प्रतीकिलो दराने विक्री होत आहे. शहाळे ३० रुपये नग, टरबूज ३० ते ४० रुपये नग तर अननस ६० रुपये प्रतिनगाप्रमाणे विक्रीस आहे.