शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

माणसांच्या जीवाला राहिले नाही मोल; महिनाभरात तब्बल ८ जणांचा झाला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:41 IST

छोट्या-मोठ्या वादातून थेट खून पाडण्याचेच प्रकार सहज होताना दिसत आहेत.

उस्मानाबाद : उन्हाच्या पर्यायासोबतच माणसांच्या डोक्याचा पाराही हल्ली चांगलाच वाढलेला दिसत आहे. छोट्या-मोठ्या वादातून थेट खून पाडण्याचेच प्रकार सहज होताना दिसत आहेत. यातूनच उस्मानाबाद जिल्ह्यात मागील महिनाभरात तब्बल ८ जणांचा खून झालेला आहे.

पती-पत्नीत चालणारी कुरबूर नवी नाही; पण या कुरबुरीतून रांजणी येथील मंगल विठ्ठल संगापुरे या महिलेचा त्यांच्या पतीनेच कोयत्याने वार करून खून केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी झाला. सतत मद्यपान करणाऱ्या पित्यासोबत झालेल्या वादानंतर मुलानेच डोक्यात दगड घालून कोथळा येथील अच्युत भागवत शिंदे यांचा खून केला. भातागळी येथील अक्षय जयवंत जगताप या २५ वर्षीय तरुणाचा घरगुती वादातून तिघांनी मारहाण करुन खून केल्याचा प्रकारही गत महिन्यातच समोर आला. करवंजी येथील प्रभावती भीमराव बेडगे या महिलेचाही जुन्या वादातून कोयत्याने वार करून खून झाला. किरकोळ वादातून मांडवा येथील युवराज त्रिंबक पाटील यांचा गळा आवळून खून करीत प्रेत तलावात फेकून दिल्याची घटना गावातील एका व्यक्तीने घडवून आणली. 

गावातीलच मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून गुंजोटी येथील जावेद सिराज काझी या तरुणाचा खून झाल्याचा आरोपही मागच्याच महिन्यात झाला होता. परभणी जिल्ह्यातील संजय नामदेव गायकवाड यांचा खून करून त्यांचा मृतदेह ढोकी-तेर रस्त्यालगत टाकून देण्यात आला. तर ढोकी येथील कृष्णा शिवशंकर कोरे या २३ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी खून करून त्याचा मृतदेह गडदेवदरीजवळ गवतात फेकून दिला. या घटना लक्षात घेता जवळपास तीन ते चार दिवसांआड उस्मानाबाद जिल्ह्यात एकाचा खून होत असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद