शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उस्मानाबाद जिल्ह्यात ८५ गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:34 IST

पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे पडल्याने टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत़

ठळक मुद्दे ७७ गावांना कुपनलिकांद्वारेप पाणीपुरवठाआठ गावांना टँकरचा आधार

उस्मानाबाद : दिवसेंदिवस दुष्काळी झळा तीव्र होत असून, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ जिल्ह्यातील ८५ गावांमध्ये निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत़ यातील ८ गावांना टँकरद्वारे तर ७७ गावांची तहान भागविण्यासाठी १२३ कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़

यंदा वेळेवर पडलेला पाऊस नंतर गायब झाला़ मध्यंतरीच्या कालावधीत कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ परतीचा पाऊस पडलाच नाही़ परिणामी जिल्ह्यातील २२३ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही़ सद्यस्थितीत ५० हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, शंभरावर प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ साधारणत: ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा जिल्ह्यात आहे़ परिणामी गावा-गावाला पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे पडल्याने टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत़

विशेषत: गावा-गावातील हातपंप, कुपनलिकाही उचक्या मारू लागल्या आहेत़ घागरभर पाण्यासाठी महिला, नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ जिल्ह्यातील शेकडो गावे टंचाईने त्रस्त झाली आहेत़ तालुकास्तरावरील प्रशासनाकडे शेकडो अधिग्रहण, टँकरचे प्रस्ताव धडकले आहेत़ निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १३१ कुपनलिकांचे अधिग्रहण केले आहे़ यात आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टँकर भरण्यासाठी आठ कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर ७७ गावांची तहान भागविण्यासाठी १२३ कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़

यात उस्मानाबाद तालुक्यातील चार गावात टँकर सुरू असून, ३९ गावांसाठी ७३ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तुळजापूर तालुक्यातील चार गावांसाठी चार अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ लोहारा तालुक्यातील दोन गावांची तहान भागविण्यासाठी दोन अधिग्रहणे करण्यात आली आहेत़

कळंब तालुक्यातील १८ गावांसाठी १८ अधिग्रहणे, भूम तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर तर दोन गावांसाठी कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ वाशी तालुक्यातील एका गावासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर परंडा तालुक्यातील दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ११ गावांसाठी ११ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़

उस्मानाबादला अधिक झळा.... सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा उस्मानाबाद तालुक्याला बसत आहेत़ उस्मानाबाद तालुक्यासाठी एकूण ७७ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ यात चार गावांसाठी टँकर सुरू असून, टँकरसाठी चार अधिग्रहणे आहेत़ तर ३९ गावांसाठी ७३ कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़

या गावांना टँकरचा आधार.... उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बावी), रुई ढोकी, नांदुर्गा, भूम तालुक्यातील वालवड व गिरवली गावांना तर परांडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी या जिल्ह्यातील आठ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईOsmanabadउस्मानाबादdroughtदुष्काळ