शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सालभर जोपासलेला ऊस डोळ्यासमोर आगीत खाक;खचलेल्या महिला शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 11:26 IST

महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला.

कळंब (जि.उस्मानाबाद) : कसायला घेतलेल्या फडात सालभर जोपासलेले ''कष्ट'' कोयता लागत नसल्याने तसेच निपचीत पडलेले होते. यातच पंधरा महिने झालेल्या या उसावर महावितरणच्या शॉर्टसर्किटचा ''कोप'' झाला. या वणव्यात कुटुंबाचा आधार असलेली ६५ वर्षीय महिला शेतकरी खचली अन् सोमवारी तिचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सौंदणा येथे घडली आहे.

मांजरा तीरावरील सौंदणा गावात प्रकल्प भरला की शिवार अन् मन खुललेले आणि फुललेले असते. गाळप हंगाम सुरू झाला की उसाच्या गोडव्याचा दरवळ प्रफुल्लित करतो. यंदा मात्र शेतकरी अतिरिक्त उसाच्या संकटाने हतबल झाले आहेत. सौंदण्याच्या पाचपिंडे कुटुंबाची काही वेगळी अवस्था नव्हती. बालाजी, विनायक अन् दत्ता हे तिघे भाऊ. जमीन जेमतेम दोन एकर. यात भागत नसल्याने शेजारच्या चुलत्यांची जमीन कसायला घेत ऊस लावला अन् सालभर कष्ट उपसत पिकवला. मात्र, तोड मिळत नसल्याने त्यांची मागच्या तीन महिन्यांपासून फरपट सुरू होती. हे कमी म्हणून की काय महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हताश झाले. यात या पाचपिंडे बांधावांची शेतकरी आई अंजनाबाई याही अस्वस्थ झाल्या. रविवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लागलीच अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलवले. मात्र, हृदयविकाराचा धक्का तीव्र स्वरूपाचा असल्याने सोमवारी सकाळी अंजनाबाई पाचपिंडे यांनी अखेरचा श्वास घेतला.

कारखाने ढुंकूनही पाहेनात...७ एप्रिल रोजी दत्ता पाचपिंडे यांचा ऊस जळाला. यानंतर तीन दिवसांनी या धक्क्यातून न सावरलेल्या त्यांच्या आई अंजनाबाई यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असे असले तरी तीन दिवसांपासून फडात जळून निपचीत पडलेला ऊस घेण्यास कोण्या कारखान्यांची यंत्रणा आलेली नव्हती. यावर खेद व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखानेOsmanabadउस्मानाबाद