शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सालभर जोपासलेला ऊस डोळ्यासमोर आगीत खाक;खचलेल्या महिला शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 11:26 IST

महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला.

कळंब (जि.उस्मानाबाद) : कसायला घेतलेल्या फडात सालभर जोपासलेले ''कष्ट'' कोयता लागत नसल्याने तसेच निपचीत पडलेले होते. यातच पंधरा महिने झालेल्या या उसावर महावितरणच्या शॉर्टसर्किटचा ''कोप'' झाला. या वणव्यात कुटुंबाचा आधार असलेली ६५ वर्षीय महिला शेतकरी खचली अन् सोमवारी तिचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सौंदणा येथे घडली आहे.

मांजरा तीरावरील सौंदणा गावात प्रकल्प भरला की शिवार अन् मन खुललेले आणि फुललेले असते. गाळप हंगाम सुरू झाला की उसाच्या गोडव्याचा दरवळ प्रफुल्लित करतो. यंदा मात्र शेतकरी अतिरिक्त उसाच्या संकटाने हतबल झाले आहेत. सौंदण्याच्या पाचपिंडे कुटुंबाची काही वेगळी अवस्था नव्हती. बालाजी, विनायक अन् दत्ता हे तिघे भाऊ. जमीन जेमतेम दोन एकर. यात भागत नसल्याने शेजारच्या चुलत्यांची जमीन कसायला घेत ऊस लावला अन् सालभर कष्ट उपसत पिकवला. मात्र, तोड मिळत नसल्याने त्यांची मागच्या तीन महिन्यांपासून फरपट सुरू होती. हे कमी म्हणून की काय महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हताश झाले. यात या पाचपिंडे बांधावांची शेतकरी आई अंजनाबाई याही अस्वस्थ झाल्या. रविवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लागलीच अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलवले. मात्र, हृदयविकाराचा धक्का तीव्र स्वरूपाचा असल्याने सोमवारी सकाळी अंजनाबाई पाचपिंडे यांनी अखेरचा श्वास घेतला.

कारखाने ढुंकूनही पाहेनात...७ एप्रिल रोजी दत्ता पाचपिंडे यांचा ऊस जळाला. यानंतर तीन दिवसांनी या धक्क्यातून न सावरलेल्या त्यांच्या आई अंजनाबाई यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असे असले तरी तीन दिवसांपासून फडात जळून निपचीत पडलेला ऊस घेण्यास कोण्या कारखान्यांची यंत्रणा आलेली नव्हती. यावर खेद व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखानेOsmanabadउस्मानाबाद