शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

स्टेअरिंग जॅम झाले अन् बस पुलाच्या कठड्यावर चढली; प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू पाहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 18:10 IST

अनर्थ टळला : वाहक, चालकासह प्रवासी बालंबाल बचावले

तेर : तीव्र वळण रस्त्यावर अचानक स्टेअरिंग जॅम झाल्याने प्रवासी घेऊन जाणारी बस तेरणा नदीपात्रावरील पुलाच्या कठड्यावर चढली. पाठीमागील चाक कठड्याला अडकल्याने बस नदीपात्रात काेसळता-काेसळता वाचली. नशीब बलवत्तर म्हणून वाहक, चालकासह आतील पाच ते सहा प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील तेरनजीक घडली.

कळंब आगाराची साेलापूर-कळंब ही बस (एमएच.१४-बीटी.१६३९) बुधवारी रात्री तेर येथे मुक्कामी हाेती. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बस धाराशिव मार्गे साेलापूर येथे गेली हाेती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही बस पुन्हा साेलापूरहून तेर येथे पाेहाेचली. येथे प्रवासी साेडल्यानंतर ही बस कळंबच्या दिशेने रवाना झाली. ही बस तेर गावानजीक असलेल्या धरणाजवळ तेरणा नदीच्या पात्रावरील पुलावर आली असता, अचानक स्टेअरिंग जॅम झाले. परिणामी, ही बस पुलाच्या कठड्यावर चढली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखले व पाठीमागील चाक कठड्यात अडकल्यामुळे बस नदीपात्रामध्ये काेसळता-काेसळता वाचली. या बसमधून वाहक, चालक व पाच ते सहा प्रवासी प्रवास करीत हाेते. यांचे नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचेच प्रमाण वाचले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बसची अवस्था पाहून उपस्थितांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महामंडळाने किमान बसेसची अवस्था तरी सुधारावी, अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केली.

तुळजापुरातच बस झाली खराब...साेलापूरहून येत असतानाच तुळजापूर येथे साेलापूर-कळंब ही बस खराब झाली हाेती. त्यामुळे तुळजापूर आगारात बस बदली करण्यात आली. ही बस कशीबशी तेर येथे पाेहाेचली. मात्र, धरणानजीक असलेल्या तेरणा नदीवरील पुलावर आल्यानंतर बसचे स्टेअरिंग अचानक जॅम झाले. त्यामुळे ही बस थेट पुलाच्या कठड्यावर चढली. पाठीमागील चाक कठड्याला अडकल्याने माेठा अनर्थ टळला.

बसमध्ये हाेते पाच प्रवासी...साेलापूर-कळंब या बसने तेर येथे काही प्रवासी साेडले. यानंतर ही बस जवळपास पाचजणांना घेऊन कळंबच्या दिशेने निघाली हाेती. वाहक, चालकासह सातजण आत हाेते. हीच बस तेरणा नदीपात्रात काेसळता-काेसळता वाचली.

बसची अवस्थाही बिकटच...तुळजापूर येथे बदली करून घेतलेल्या बसची अवस्थाही फार काही चांगली नव्हती. खिडक्यांच्या काचा खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी पत्रा उचकटलेला आहे. याच बसचे स्टेअरिंग जॅम झाल्याने दुर्घटना घडली.

प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची नाही का?एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलतीच्या येाजना आणल्या आहेत. मात्र, दुसरीकडे बहुतांशी बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जीव मुठीत धरून लाेकांना प्रवास करावा लागत आहे. अनेक बसेस वापराबाहेर गेल्या आहेत. तरीही दामटल्या जात आहेत. परिणामी, अपघाती घटनांमध्ये माेठी वाढ झाली आहे. असे असतानाही महामंडळाकडून मात्र उपाययाेजना हाेताना दिसत नाहीत. महामंडळाला लाेकांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही का, असा सवाल प्रवासी सहदेव कावळे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Accidentअपघातdharashivधाराशिवstate transportएसटी