शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

स्टेअरिंग जॅम झाले अन् बस पुलाच्या कठड्यावर चढली; प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू पाहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 18:10 IST

अनर्थ टळला : वाहक, चालकासह प्रवासी बालंबाल बचावले

तेर : तीव्र वळण रस्त्यावर अचानक स्टेअरिंग जॅम झाल्याने प्रवासी घेऊन जाणारी बस तेरणा नदीपात्रावरील पुलाच्या कठड्यावर चढली. पाठीमागील चाक कठड्याला अडकल्याने बस नदीपात्रात काेसळता-काेसळता वाचली. नशीब बलवत्तर म्हणून वाहक, चालकासह आतील पाच ते सहा प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील तेरनजीक घडली.

कळंब आगाराची साेलापूर-कळंब ही बस (एमएच.१४-बीटी.१६३९) बुधवारी रात्री तेर येथे मुक्कामी हाेती. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बस धाराशिव मार्गे साेलापूर येथे गेली हाेती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही बस पुन्हा साेलापूरहून तेर येथे पाेहाेचली. येथे प्रवासी साेडल्यानंतर ही बस कळंबच्या दिशेने रवाना झाली. ही बस तेर गावानजीक असलेल्या धरणाजवळ तेरणा नदीच्या पात्रावरील पुलावर आली असता, अचानक स्टेअरिंग जॅम झाले. परिणामी, ही बस पुलाच्या कठड्यावर चढली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखले व पाठीमागील चाक कठड्यात अडकल्यामुळे बस नदीपात्रामध्ये काेसळता-काेसळता वाचली. या बसमधून वाहक, चालक व पाच ते सहा प्रवासी प्रवास करीत हाेते. यांचे नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचेच प्रमाण वाचले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बसची अवस्था पाहून उपस्थितांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महामंडळाने किमान बसेसची अवस्था तरी सुधारावी, अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केली.

तुळजापुरातच बस झाली खराब...साेलापूरहून येत असतानाच तुळजापूर येथे साेलापूर-कळंब ही बस खराब झाली हाेती. त्यामुळे तुळजापूर आगारात बस बदली करण्यात आली. ही बस कशीबशी तेर येथे पाेहाेचली. मात्र, धरणानजीक असलेल्या तेरणा नदीवरील पुलावर आल्यानंतर बसचे स्टेअरिंग अचानक जॅम झाले. त्यामुळे ही बस थेट पुलाच्या कठड्यावर चढली. पाठीमागील चाक कठड्याला अडकल्याने माेठा अनर्थ टळला.

बसमध्ये हाेते पाच प्रवासी...साेलापूर-कळंब या बसने तेर येथे काही प्रवासी साेडले. यानंतर ही बस जवळपास पाचजणांना घेऊन कळंबच्या दिशेने निघाली हाेती. वाहक, चालकासह सातजण आत हाेते. हीच बस तेरणा नदीपात्रात काेसळता-काेसळता वाचली.

बसची अवस्थाही बिकटच...तुळजापूर येथे बदली करून घेतलेल्या बसची अवस्थाही फार काही चांगली नव्हती. खिडक्यांच्या काचा खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी पत्रा उचकटलेला आहे. याच बसचे स्टेअरिंग जॅम झाल्याने दुर्घटना घडली.

प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची नाही का?एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलतीच्या येाजना आणल्या आहेत. मात्र, दुसरीकडे बहुतांशी बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जीव मुठीत धरून लाेकांना प्रवास करावा लागत आहे. अनेक बसेस वापराबाहेर गेल्या आहेत. तरीही दामटल्या जात आहेत. परिणामी, अपघाती घटनांमध्ये माेठी वाढ झाली आहे. असे असतानाही महामंडळाकडून मात्र उपाययाेजना हाेताना दिसत नाहीत. महामंडळाला लाेकांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही का, असा सवाल प्रवासी सहदेव कावळे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Accidentअपघातdharashivधाराशिवstate transportएसटी