शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यारंभ आदेश निघूनही रस्त्याचे काम सुरू होईना; त्रस्त ग्रामस्थांनी घेतले चिखलात लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 16:51 IST

अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने वाहनधारक, शेतकऱ्यांना चिखलवाट तुडवीत रस्ता कापावा लागतोय.

कळंब (उस्मानाबाद) : एकीकडे ग्रामीण रस्त्यांची सुधारणा होत नसल्याने चिखलवाट तुडवावी लागत असताना दुसरीकडे मात्र कोट्यावधीचा निधी मंजूर होवूनही काही कामांना कंत्राटदार हात लावत नसल्याचे चित्र आहे. अशाच मंजूर रस्त्याचे काम सुरू केले जात नसल्याने खामसवाडीच्या त्रस्त ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या चिखलात लोटांगण घेत ठिय्या आंदोलन केले.

अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने वाहनधारक, शेतकऱ्यांना चिखलवाट तुडवीत रस्ता कापावा लागतोय. अशी वाईट स्थिती असताना जिपच्या काही रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडकमधून कोट्यावधीचा निधी मंजूर होत निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. खेर्डा ते नागझरवाडी रस्त्यासाठीही साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला, पण काम सुरू न केल्याने खामसवाडीच्या ग्रामस्थांना डबक्यातील पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. नेहमीच्या त्रासाला कंटाळून आज शिवसेनेचे उपतालुकप्रमुख तथा माजी पंस सदस्य अमोल पाटील यांच्या नेतृत्वात आज लोटांगण आंदोलन करण्यात आले. खेर्डा ते नागझरवाडी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या चिखलात ठिय्या मारत ग्रामस्थांनी लोटांगण घातले. आंदोलनात संतोष कोळी, धनंजय कोळी, बालाजी बप्पा, राजेंद्र शेळके, बाळासाहेब कोळी, बाळासाहेब पाटील, लाला पवार आदींचा सहभाग होता. दरम्यान, प्रशासनाकडून उपअभियंता अझरुद्दीन सय्यद यांनी पुढच्या आठ दिवसांमध्ये काम मार्गी लागेल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagitationआंदोलन