शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नव्या कुणबी दाखल्याचा आधार, आथर्डीत ठरल्या पहिल्या सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:46 IST

सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित

कळंब (जि. धाराशिव) : धाराशिव जिल्ह्यातील आथर्डी येथील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदाच्या रिक्त जागी कुसुम चौधरी यांची निवड जाहीर झाली आहे. त्यांनी अलिकडेच निर्गमित झालेले ''कुणबी'' प्रमाणपत्र उमेदवारी अर्जास संलग्न केले होते. या माध्यमातून मराठा आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रावर सरपंच झालेल्या त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला सरपंच ठरल्या.

आथर्डी (ता. कळंब) येथील सात सदस्यीय ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती. येथील सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने तद्नंतर झालेल्या सरपंच निवडीत रतन अशोक सुब्रे यांची निवड झाली होती. सरपंच रतन सुब्रे यांनी मागच्या काही महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जागा रिक्त झाल्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी २ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा तहसील कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या कुसुम काकासाहेब चौधरी यांनी अर्ज दाखल केला. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर झाली. अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी प्रणिता दराडे यांनी काम पाहिले.

नव्यानेच मिळाले होते प्रमाणपत्रसरपंच बनलेल्या कुसुम चौधरी यांना नुकतेच ''कुणबी'' प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते. त्यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल करताना हेच कुणबी प्रमाणपत्र व याच्या पडताळणीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती सादर केली होती. यावरून चौधरी यांची नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला सरपंचपदी निवड झाली आहे.

जरांगे-पाटील यांची घेतली भेटनूतन सरपंच कुसुम चौधरी, अतुल गायकवाड, चेतन कात्रे, दत्ता तनपुरे, ॲड. अशोक चोंदे, शंकरचंद्र खंडागळे, पंडित देशमुख, नितीन चौधरी यांनी निवड जाहीर झाल्यानंतर जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाची फलश्रुती कथन केली व आभारही मानले.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतOsmanabadउस्मानाबाद