शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद येथे भरधाव वेगातील टेम्पो ट्रकवर आदळला; शेतकरी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 16:54 IST

इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपाकडे वळणाऱ्या ट्रकवर भरधाव वेगातील टेम्पो आदळला. या अपघातात टेम्पोतील शेतकरी जागीच ठार झाला.

वाशी (उस्मानाबाद) : इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपाकडे वळणाऱ्या ट्रकवर भरधाव वेगातील टेम्पो आदळला. या अपघातात टेम्पोतील शेतकरी जागीच ठार झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील सरमकुंडी शिवारातील पेट्रोलपंपानजीक घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील औरंगाबाद  ते सोलापूर या महामार्गावरील सरमकुंडी शिवारात मोटे यांचा पेट्रोलपंप आहे. सरकी पेंड घेऊन जाणारा ट्रक (क्र.एमएच.१२/क्यूए.९६३६) इंधन भरण्यासाठी सदरील पेट्रोलपंपवार जात होता. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेला टेम्पो (क्र. एमएच.१०/५७८०) संबंधित ट्रकवर जावून आदळाला. 

या भिषण अपघातात टेम्पोमध्ये बसलेले शेतकरी सुभाष बाबुराव तळेकर  (वय ५०, रा. शहापूर, ता. अंबड, जि. जालना) यांचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोचालक कृष्णा  परमेश्वर भाकड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान,  टेम्पोची धडक ही ट्रकच्या डिझेलच्या टाकीला बसल्यामुळे ट्रकने पेट घेतला. या आगीमध्ये ट्रकसह सरकी पेंडही जळून खाक झाली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोनि सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनिल रणदिवे हे घटनेचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग