शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईचे चटके तीव्र; टँकरने ओलांडली चाळीशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 19:37 IST

टंचाईचे चटके अधिक तीव्र बनले असून जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत.

ठळक मुद्देदिवागणिक प्रस्तवावांत भर अधिग्रहणे पोहोचली साडेतीनशेवर

उस्मानाबाद : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. मार्च महिना उजाडल्यापासून तर टंचाईचे चटके अधिक तीव्र बनले असून जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या मागणीचे प्रस्तावही त्याच गतीने धडकू लागले आहेत. आजघडीला टँकरने चाळीशी ओलांडली असून अधिग्रहणांची संख्या तर तब्बल साडेतीनशेवर पोहोचली आहे. 

यंदा मान्सूच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. अख्ख्या पावसाळ्या वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला. त्यामुळे लघु, मोठे अन् मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे अनेक गावांना ऐन हिवाळ्यातच टंचाईचे चटके बसण्यास सुरूवात झाली. अशा गावांमध्ये आजघडीला अत्यंत भीषण स्थिती आहे. दरम्यान, सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा ३७ अंश सेल्सिअसवर जावून ठेपला आहे. उन्हाच्या वाढलेल्या या तीव्रतेमुळे जलस्त्रोत झपाट्याने कारेड पडत आहेत. त्यामुळे दिवसागणिक टंचाईचे संकट गडद होत असल्याचे चित्र आहे. टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतींकडून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल होत आहेत. मात्र, आलेल्या प्रस्तावांना अपेक्षित गतीने मंजुरी दिली जात नाही, असा आरोप ग्रामपंचायतींकडून केला जात आहे. 

आजघडीला जिल्ह्यातील २५६ गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ यापैकी २१८ गावांसाठी विहीर, कुपनलिकांसारख्या स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अशा अधिग्रहणांची संख्या ३५८ वर जावून ठेपली आहे. तर दुसरीकडे ज्या गावांच्या परिसरात अधिग्रहण करण्यासाठीही स्त्रोत उपलब्ध नाहीत, तेथे टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे.

जिल्हाभरातील ३८ गावांना  तर ३८ गावातील  १ लाख ७ हजार ८२४ नागरिकांची तहान ४७ टँकर्सच्या पाण्यावर भागविली जात आहे़ सध्या उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बावी), रुई ढोकी, नांदुर्गा, खामगाव, येडशी, बेंबळी, ताकविकी, केशेगाव, करजखेडा, वाणेवाडी, जवळे दु़ या १२ गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ तर तुळजापूर तालुक्यात भातंब्री, उमरगा तालुक्यातील बेळंब, कळंब तालुक्यातील शिंगोली, ताडगाव, भाटशिरपुरा, देवळाली, मस्सा (खं़),शेलगांव (ज़), पिंपळगाव (डो़), पाडोळी या ८ गावांना तर भूम तालुक्यातील वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरुड, सावरगाव (दरे़),वारेवडगाव कासारी, गोमाळा कृष्णापूर, आंबी, हिवर्डा, गोलेगाव, आंतरगाव या ११ गावे त्याचबरोबर परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी, मुगाव, कुकडगाव अशा ४ गावांचा समावेश आहे़ असे एकूण जिल्हाभरातील ३८ गावांतील १ लाख ७ हजार ८२४ ग्रामस्थांची तहान ४७ टँकरच्या माध्यमातून भागविली जात आहे. 

या गावांना टँकरने पाणी....उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बावी), रुई ढोकी, नांदुर्गा, खामगाव, येडशी, बेंबळी, ताकविकी, केशेगाव, करजखेडा, वाणेवाडी, जवळे (दु़). तुळजापूर- भातंब्री, उमरगा तालुक्यातील बेळंब. कळंब-शिंगोली, ताडगाव, भाटशिरपुरा, देवळाली, मस्सा (खं़),शेलगांव (ज़), पिंपळगाव (डो़), पाडोळी. भूम-वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरुड, सावरगाव (दरे़), वारेवडगाव कासारी, गोमाळा कृष्णापूर, आंबी, हिवर्डा, गोलेगाव, आंतरगाव. परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी, मुगाव, कुकडगावला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद