पाणी पिण्याची विहीर बुजविणाऱ्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST2021-04-17T04:32:41+5:302021-04-17T04:32:41+5:30
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, तालुक्यातील शेकापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका समाजाची पिण्याची विहीर होती. टंचाई काळात या ...

पाणी पिण्याची विहीर बुजविणाऱ्यावर कारवाई करा
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, तालुक्यातील शेकापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका समाजाची पिण्याची विहीर होती. टंचाई काळात या गावातील नागरिकांना या विहिरीचा आधार ठरत असे. मात्र, शेतकऱ्यांच्या मुलांनी २ एप्रिल रोजी ही विहीर जे.सी.बी.ने बुजविली आहे. विहीर बुजविताना काही ग्रामस्थांनी अडविले असता त्यांना धक्काबुक्की करून जातिवाचक शिवीगाळ करण्याता आली. विहीर बुजविल्याने गावातील एका समाजाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे विहीर बुजविणाऱ्यावर कारवाई करून पिण्याच्या प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर नागनाथ कांबळे, संदीप कांबळे, शक्ती कांबळे, उत्तम कांबळे, भारत कांबळे, सचिन कांबळे, बाळू कांबळे, मधुकर कांबळे, शंकर कांबळे, गणेश कांबळे, सुरेश शेंडगे, नाना डोलारे, नवनाथ डोलारे, अशोक कांबळे, माणिक कांबळे आदींची नावे आहेत.