शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

ऊसदर नियंत्रण समिती सरकारच्या हातचे बाहुले - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 15:28 IST

शेतकरी हिताच्या गप्पा मारीत सरकारने स्थापन केलेल्या ऊसदर नियंत्रण समितीमध्ये साखर कारखानदारच घुसले आहेत. त्यामुळे अशा समितीकडून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल करीत समिती सरकारच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केला.

ठळक मुद्देसमिती सरकारच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केला.‘एफआरपी’ थकवलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरी सुद्धा अनेक कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले.  सरकार आणि कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही खा. शेट्टी यांनी केला.

उस्मानाबाद : शेतकरी हिताच्या गप्पा मारीत सरकारने स्थापन केलेल्या ऊसदर नियंत्रण समितीमध्ये साखर कारखानदारच घुसले आहेत. त्यामुळे अशा समितीकडून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल करीत समिती सरकारच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापकअध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केला. उस्मानाबादेत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

खा. शेट्टी म्हणाले, ‘एफआरपी’ थकवलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरी सुद्धा अनेक कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले.  बहुतांश कारखाने सुरूही झाले. यापैकी काही कारखान्यांनी साखर आयुक्तांना खोटी माहिती सादर करून ‘एफआरपी’ दिल्याचे भासविले. अशा कारखान्यांच्या यादीत राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याही कारखान्याचा समावेश आहे. सरकार आणि कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही खा. शेट्टी यांनी केला. दरम्यान, आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस संघटनेचे प्रकाश पोकळे, पूजा मोरे, माणिक कदम, जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे आदींची उपस्थिती होती.

सर्व डाव शिकायला तेवढी बुद्धी लागते...

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरही खा. शेट्टी यांनी निशाना साधला. वस्ताद कोणत्याही पैलवानाला सर्वच डाव शिकवत नसतो. आणि डाव शिकायलाही तेवढी बुद्धी लागते. त्यामुळे कोण बाजुला गेले? याची मला फिकीर नाही, अशा शब्दात नाव न घेता सदाभाऊ खोत यांना टोला लगावला. 

कोल्हापूर, सांगली वगळता आंदोलन सुरूच...

कोल्हापूर आणि सांगलीतील कारखानदारांनी शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार पैसे देऊ, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे रविवारचे येथील चक्काजाम आंदोलन स्थागित करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित जिल्ह्यात हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे खा. शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना