शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

साखर, तेल महागल्याने मिठाईचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

उस्मानाबाद : मागील काही दिवसात साखर, डाळी, सिलिंडर गॅस, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने मिठाईच मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ...

उस्मानाबाद : मागील काही दिवसात साखर, डाळी, सिलिंडर गॅस, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने मिठाईच मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीत गोडवा कमी झाल्याचे चित्र आहे. मिठाईच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या कालावधीत जीवनाश्यक वस्तूंचे दरही सातत्याने वाढत आहेत. तेलाचे दर १५० रुपये किलोच्या पुढे सरकले आहेत. त्याचबरोबर डाळीही महागल्या आहेत. सिलिंडरच्या गॅसच्या दरातही सातत्याने वाढ होत चालली आहे. साखर ३२ रुपयांवरुन ३६ रुपये किलो झाली आहे. सणासुदीच्या दिवसात दुधाचे दर जैसे थे आहेत. मात्र, अन्य साहित्य महागल्याने मिठाईचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याची झळ ग्राहकांच्या खिशाला बसत आहे.

का वाढले दर?

दूधाचे दर 'जैसे थे' असले तरी तेल, साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दरात मिठाई तयार करुन विकणे अशक्य झाले आहे. त्यात ग्राहकांची संख्याही घटल्याने नाईलास्तव दरवाढ करावी लागली.

विक्रम गेहलोत, स्वीट मार्ट चालक

कोरोना काळात आमचे मोठे नुकसान झाले. मागील काही महिन्यांपासून तेलाचे दर वाढले आहेत. साखरही महागली आहे. त्यामुळे दुधाचे दर स्थिर असले तरी पूर्वीच्या दरात मिठाई विकणे परवडणारे नाही.

नरसिंग राजपूत, स्वीट मार्ट चालक

दरावर नियंत्रण कोणाचे

उपहार गृह, हॉटेल किंवा स्वीट मार्टमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता दर्जा आदीबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र, याच हॉटेल, स्वीटमार्टमध्ये दर विक्रेते स्वत: निर्धारीत करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात कुठलीच यंत्रणा नाही.

भेसळीकडे लक्ष असू द्या

स्वीटमार्ट, हॉटेलात मिठाईपासून जे दूधाचे पदार्थ बनवितात त्यामध्ये मैदाची भेसळ होण्याची शक्यता असते. यातून एखादवेळी मिठाई खाणाऱ्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मिठाई खरेदी करताना प्रत्येकाने ती पारखूनच खरेदी केली पाहिजे.

ग्राहक म्हणतात

कोरोना काळात सर्व चित्र पालटत आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. खाद्यतेल, साखर, डाळ महागली आहे. त्यामुळे मिठाईच्या किमती वाढल्या आहेत. त्याची खिशाला झळ बसत आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

अनिल कांबळे, ग्राहक

सद्यस्थितीत गणेशोत्सव सण साजरा होत आहे. या काळात आरतीनंतर प्रसाद म्हणून मिठाई दिली जाते. त्यामुळे मोदक, पेढा, मोतीचूर लाडू, बेसन लाडू या मिठाईला ग्राहक पसंती देतात. मात्र, या सर्वच मिठाईचे दर दोन महिन्यांपासून वाढले आहेत. खरेदी करतानाच खिसा पाहूनच खरेदी करावी लागत आहे.

तानाजी भोसले, ग्राहक