शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

साखर, तेल महागल्याने मिठाईचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

उस्मानाबाद : मागील काही दिवसात साखर, डाळी, सिलिंडर गॅस, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने मिठाईच मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ...

उस्मानाबाद : मागील काही दिवसात साखर, डाळी, सिलिंडर गॅस, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने मिठाईच मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीत गोडवा कमी झाल्याचे चित्र आहे. मिठाईच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या कालावधीत जीवनाश्यक वस्तूंचे दरही सातत्याने वाढत आहेत. तेलाचे दर १५० रुपये किलोच्या पुढे सरकले आहेत. त्याचबरोबर डाळीही महागल्या आहेत. सिलिंडरच्या गॅसच्या दरातही सातत्याने वाढ होत चालली आहे. साखर ३२ रुपयांवरुन ३६ रुपये किलो झाली आहे. सणासुदीच्या दिवसात दुधाचे दर जैसे थे आहेत. मात्र, अन्य साहित्य महागल्याने मिठाईचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याची झळ ग्राहकांच्या खिशाला बसत आहे.

का वाढले दर?

दूधाचे दर 'जैसे थे' असले तरी तेल, साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दरात मिठाई तयार करुन विकणे अशक्य झाले आहे. त्यात ग्राहकांची संख्याही घटल्याने नाईलास्तव दरवाढ करावी लागली.

विक्रम गेहलोत, स्वीट मार्ट चालक

कोरोना काळात आमचे मोठे नुकसान झाले. मागील काही महिन्यांपासून तेलाचे दर वाढले आहेत. साखरही महागली आहे. त्यामुळे दुधाचे दर स्थिर असले तरी पूर्वीच्या दरात मिठाई विकणे परवडणारे नाही.

नरसिंग राजपूत, स्वीट मार्ट चालक

दरावर नियंत्रण कोणाचे

उपहार गृह, हॉटेल किंवा स्वीट मार्टमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता दर्जा आदीबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र, याच हॉटेल, स्वीटमार्टमध्ये दर विक्रेते स्वत: निर्धारीत करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात कुठलीच यंत्रणा नाही.

भेसळीकडे लक्ष असू द्या

स्वीटमार्ट, हॉटेलात मिठाईपासून जे दूधाचे पदार्थ बनवितात त्यामध्ये मैदाची भेसळ होण्याची शक्यता असते. यातून एखादवेळी मिठाई खाणाऱ्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मिठाई खरेदी करताना प्रत्येकाने ती पारखूनच खरेदी केली पाहिजे.

ग्राहक म्हणतात

कोरोना काळात सर्व चित्र पालटत आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. खाद्यतेल, साखर, डाळ महागली आहे. त्यामुळे मिठाईच्या किमती वाढल्या आहेत. त्याची खिशाला झळ बसत आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

अनिल कांबळे, ग्राहक

सद्यस्थितीत गणेशोत्सव सण साजरा होत आहे. या काळात आरतीनंतर प्रसाद म्हणून मिठाई दिली जाते. त्यामुळे मोदक, पेढा, मोतीचूर लाडू, बेसन लाडू या मिठाईला ग्राहक पसंती देतात. मात्र, या सर्वच मिठाईचे दर दोन महिन्यांपासून वाढले आहेत. खरेदी करतानाच खिसा पाहूनच खरेदी करावी लागत आहे.

तानाजी भोसले, ग्राहक