शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

उस्मानाबादला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

उस्मानाबाद - शहराला चाेवीस तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत याेजना मंजूर करण्ययात आल्या. ...

उस्मानाबाद - शहराला चाेवीस तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत याेजना मंजूर करण्ययात आल्या. या याेजनेद्वारे शहरास चाेवीस तास पाणीपुरवठ्याचे नियाेजन हाेते. परंतु, यानअुषंगाने पाऊले उचलली जात नसल्याने आजही उस्मानाबादकरांना चाेवीस तास मिळत नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करावयाच्या उपायाेजनांचा अहवाल १० दिवसांत सादर करावा, अशी सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत याेजनेतून पहिल्या टप्प्यात ८ ‘एमएलडी’ क्षमतेची योजना कार्यान्वित करणे. दुसऱ्या टप्प्यात योजनेची क्षमता ८ वरून १६ ‘एमएलडी’ करणे तसेच आवश्यक जलकुंभ, अंतर्गत पाईपलाईन व जलशुद्धीकरण केंद्र उभारणे तर तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत पाईपलाईनचे काम पुर्ण करून मिटरद्वारे शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजित होते. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमृत याेजनेतून नव्याने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले. मात्र २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या अनुषंगाने ठोस पावले उचलली जात नसल्याची बाब समाेर आल्यानंतर २० जानेवारी राजी आमदार पाटील यांनी नगर परिषद व प्राधिकरणाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी वाढीव क्षमता उपलब्ध झाल्यानंतर सध्यस्थितीत उजनी जलाशयातून उस्मानाबाद शहरात नेमके किती पाणी येते? याबाबत आ. पाटील यांनी विचारणा केली असता, पाणीपुरवठा अभियंता नरे यांनी ‘फ्लो-मीटर’ नादुरुस्त असल्याचे धक्कादायक विधान केले. तसेच आजही शहर वासियांना ६ दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले. यानंतर आ. पाटील यांनी पालिका मुख्याधिकारी येलगट्टे यांना शहरास २४ तास पाणी देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपायाेजनांचा अहवाल १० दिवसांत द्यावा .तसेच शहरानजीकच्या तेरणा व रूईभर या स्त्रोतातून जास्तीत जास्त पाणी उचलण्याबाबत सूचना केली. बैठकीस उपनगराध्यक्ष अभय इंगळे, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, विरोधी पक्ष नेते युवराज नळे, पाणीपुरवठा सभापती अंजना पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रमेश ढवळे, शाखा अभियंता सुजित जाधव, पाणीपुरवठा अभियंता अक्षय नरे आदींची उपस्थिती हाेती.

चाैकट.....

याेजनेचे काम अपेक्षित गतीने झाले नाही..

२०१३ मध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना, अंतर्गत जलवाहिनी व वाढीव क्षमतेच्या जलकुंभांची कामे पूर्ण झालेली नसतानाही आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून शहरातील नागरिकांना ४ दिवसाआड पाणी दिले जात होते. २०१६ नंतर ज्या गतीने योजनेचे काम व्हायला हवे होते त्यानुसार झाले नाही. त्यामुळे शहराला २४ तास पाणी देता येत नाही. एवढेच नाही शहरातील १५ ते २० टक्के भागात खास करून हद्दवाढ परिसरात पाइपलाइनचे काम अद्याप शिल्लक आहे. याचाही परिणाम पाणीपुरवठ्यावर हाेत असल्याचे बैठकीतून समाेर आले.