शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

उस्मानाबादला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

उस्मानाबाद - शहराला चाेवीस तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत याेजना मंजूर करण्ययात आल्या. ...

उस्मानाबाद - शहराला चाेवीस तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत याेजना मंजूर करण्ययात आल्या. या याेजनेद्वारे शहरास चाेवीस तास पाणीपुरवठ्याचे नियाेजन हाेते. परंतु, यानअुषंगाने पाऊले उचलली जात नसल्याने आजही उस्मानाबादकरांना चाेवीस तास मिळत नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करावयाच्या उपायाेजनांचा अहवाल १० दिवसांत सादर करावा, अशी सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत याेजनेतून पहिल्या टप्प्यात ८ ‘एमएलडी’ क्षमतेची योजना कार्यान्वित करणे. दुसऱ्या टप्प्यात योजनेची क्षमता ८ वरून १६ ‘एमएलडी’ करणे तसेच आवश्यक जलकुंभ, अंतर्गत पाईपलाईन व जलशुद्धीकरण केंद्र उभारणे तर तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत पाईपलाईनचे काम पुर्ण करून मिटरद्वारे शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजित होते. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमृत याेजनेतून नव्याने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले. मात्र २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या अनुषंगाने ठोस पावले उचलली जात नसल्याची बाब समाेर आल्यानंतर २० जानेवारी राजी आमदार पाटील यांनी नगर परिषद व प्राधिकरणाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी वाढीव क्षमता उपलब्ध झाल्यानंतर सध्यस्थितीत उजनी जलाशयातून उस्मानाबाद शहरात नेमके किती पाणी येते? याबाबत आ. पाटील यांनी विचारणा केली असता, पाणीपुरवठा अभियंता नरे यांनी ‘फ्लो-मीटर’ नादुरुस्त असल्याचे धक्कादायक विधान केले. तसेच आजही शहर वासियांना ६ दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले. यानंतर आ. पाटील यांनी पालिका मुख्याधिकारी येलगट्टे यांना शहरास २४ तास पाणी देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपायाेजनांचा अहवाल १० दिवसांत द्यावा .तसेच शहरानजीकच्या तेरणा व रूईभर या स्त्रोतातून जास्तीत जास्त पाणी उचलण्याबाबत सूचना केली. बैठकीस उपनगराध्यक्ष अभय इंगळे, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, विरोधी पक्ष नेते युवराज नळे, पाणीपुरवठा सभापती अंजना पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रमेश ढवळे, शाखा अभियंता सुजित जाधव, पाणीपुरवठा अभियंता अक्षय नरे आदींची उपस्थिती हाेती.

चाैकट.....

याेजनेचे काम अपेक्षित गतीने झाले नाही..

२०१३ मध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना, अंतर्गत जलवाहिनी व वाढीव क्षमतेच्या जलकुंभांची कामे पूर्ण झालेली नसतानाही आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून शहरातील नागरिकांना ४ दिवसाआड पाणी दिले जात होते. २०१६ नंतर ज्या गतीने योजनेचे काम व्हायला हवे होते त्यानुसार झाले नाही. त्यामुळे शहराला २४ तास पाणी देता येत नाही. एवढेच नाही शहरातील १५ ते २० टक्के भागात खास करून हद्दवाढ परिसरात पाइपलाइनचे काम अद्याप शिल्लक आहे. याचाही परिणाम पाणीपुरवठ्यावर हाेत असल्याचे बैठकीतून समाेर आले.