शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा

By चेतनकुमार धनुरे | Updated: March 21, 2023 18:44 IST

सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धाराशिव : केवळ कागदपत्रावर नवे-जुने होणारी प्रक्रिया जिल्हा बँकेने बदललेली आहे. यावर्षी संपूर्ण रक्कम भरुनच ही प्रक्रिया केली जात असून, वसुलीसाठी बँक व सोसायट्यांनी शेतकऱ्यांमागे लावलेला तगादा थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवारी भाजपकडून देण्यात आला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन हे प्रकरण कानी घातले. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रत्यक्ष शेतकरी कर्जदारास कर्ज व व्याजाची रक्कम भरूनच कर्ज प्रकरण नवे-जुने करावे, असा जुलुमी नियम यावेळी घातला आहे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकाएकी एवढी रक्कम शेतकऱ्यांना भरणे अवघड आहे. रक्कम भरुनही कर्ज प्रकरण दाखल केले तर कर्ज मिळेल, याची बँक शाश्वती देत नाही. या विषयात लक्ष घालून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त व्याज भरून घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण नवे-जुने करण्याच्या सूचना बँकेस देण्यात याव्यात, अशी विनंती जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. वसुलीचा तगादा नाही थांबवल्यास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम, युवराज नळे, बालाजी गावडे, नवनाथ कांबळे, मोहन खापरे, काका शेळके, संतोष आगलावे व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादBJPभाजपा