शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा

By चेतनकुमार धनुरे | Updated: March 21, 2023 18:44 IST

सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धाराशिव : केवळ कागदपत्रावर नवे-जुने होणारी प्रक्रिया जिल्हा बँकेने बदललेली आहे. यावर्षी संपूर्ण रक्कम भरुनच ही प्रक्रिया केली जात असून, वसुलीसाठी बँक व सोसायट्यांनी शेतकऱ्यांमागे लावलेला तगादा थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवारी भाजपकडून देण्यात आला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन हे प्रकरण कानी घातले. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रत्यक्ष शेतकरी कर्जदारास कर्ज व व्याजाची रक्कम भरूनच कर्ज प्रकरण नवे-जुने करावे, असा जुलुमी नियम यावेळी घातला आहे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकाएकी एवढी रक्कम शेतकऱ्यांना भरणे अवघड आहे. रक्कम भरुनही कर्ज प्रकरण दाखल केले तर कर्ज मिळेल, याची बँक शाश्वती देत नाही. या विषयात लक्ष घालून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त व्याज भरून घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण नवे-जुने करण्याच्या सूचना बँकेस देण्यात याव्यात, अशी विनंती जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. वसुलीचा तगादा नाही थांबवल्यास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम, युवराज नळे, बालाजी गावडे, नवनाथ कांबळे, मोहन खापरे, काका शेळके, संतोष आगलावे व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादBJPभाजपा