शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा

By चेतनकुमार धनुरे | Updated: March 21, 2023 18:44 IST

सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धाराशिव : केवळ कागदपत्रावर नवे-जुने होणारी प्रक्रिया जिल्हा बँकेने बदललेली आहे. यावर्षी संपूर्ण रक्कम भरुनच ही प्रक्रिया केली जात असून, वसुलीसाठी बँक व सोसायट्यांनी शेतकऱ्यांमागे लावलेला तगादा थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवारी भाजपकडून देण्यात आला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन हे प्रकरण कानी घातले. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रत्यक्ष शेतकरी कर्जदारास कर्ज व व्याजाची रक्कम भरूनच कर्ज प्रकरण नवे-जुने करावे, असा जुलुमी नियम यावेळी घातला आहे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकाएकी एवढी रक्कम शेतकऱ्यांना भरणे अवघड आहे. रक्कम भरुनही कर्ज प्रकरण दाखल केले तर कर्ज मिळेल, याची बँक शाश्वती देत नाही. या विषयात लक्ष घालून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त व्याज भरून घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण नवे-जुने करण्याच्या सूचना बँकेस देण्यात याव्यात, अशी विनंती जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. वसुलीचा तगादा नाही थांबवल्यास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम, युवराज नळे, बालाजी गावडे, नवनाथ कांबळे, मोहन खापरे, काका शेळके, संतोष आगलावे व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादBJPभाजपा