शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिवच्या डीपीसी निधीवरील स्टे उठणार; भाजप-शिंदेसेनेत पॅचअपची अजित पवारांमुळे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:13 IST

धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सुमारे अडीचशे कोटींचा निधी शिल्लक होता.

धाराशिव : २०२४-२५ या संपलेल्या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे अडीचशे कोटींच्या निधीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. निधी वाटपातील गडबडीचा दाखला देत भाजपने पालकमंत्र्यांची तक्रार केल्यानंतर भाजप व शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडली. मात्र, मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीवरील स्थगिती उठविण्यात येत असल्याचे जाहीर केल्याने भाजप-शिंदेसेनेत पॅचअप झाल्याची चर्चा होत आहे.

धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सुमारे अडीचशे कोटींचा निधी शिल्लक होता. विधानसभा निवडणुकीनंतर पालकमंत्री म्हणून शिंदेसेनेच्या प्रताप सरनाईकांची वर्णी लागली. अखेरच्या टप्प्यात या निधीतून घाईगडबडीत कामांना मंजुरी दिल्याचा व त्यात गडबडी झाल्याचा दावा करीत भाजपचे काही पदाधिकारी मुख्यमंत्र्यांकडे धडकले. यानंतर लागलीच १ एप्रिल रोजी या निधीला स्थगिती देणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. तेव्हापासून या निधीवरील स्थगिती उठलेली नाही. यादरम्यानच्या काळात भाजप व शिंदेसेनेत यावरून बराच कलगीतुरा झाला. मात्र, १२७ दिवसांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ ऑगस्ट रोजी या निधीवरील स्थगिती उठवीत असल्याचे जाहीर केले. यासाठी पालकमंत्री सरनाईक यांना सोबत घेऊन बैठक झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला. त्यामुळे जिल्ह्यात भाजप व शिंदेसेनेत पॅचअप झाल्याची चर्चा रंगली आहे.

सूत्रावरून निधीचे गणितच बिघडलेनियोजन समितीच्या निधी वाटपाचे प्राधान्यक्रम, लोकसंख्येचा निकष, असे काही संकेत व नियमही आहेत. मात्र, सहसा ते कोठे पाळले जात नाही. सत्ताधारी व विरोधकांच्या निधीचे सूत्र ठरवून त्यानुसार ते वाटप केले जाते. दरम्यान, शिंदेसेनेच्या पालकमंत्र्यांनी ठाकरे सेनेला सूत्रात झुकते माप दिल्याची चर्चा तेव्हा झाली. स्थगितीला याचीही एक किनार आहे. त्यामुळे निधीच गोठवला गेला.

नव्या सूत्राची कार्यकर्त्यांना उत्सुकताउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत निधी वाटपाचे सर्वानुमते नवे सूत्र ठरल्याचेही सांगितले. त्यामुळे हे नवे सूत्र कसे असणार, कोणाचा वाटा वाढणार, कोणाचा घटणार, याची कार्यकर्त्यांमध्ये चवीने चर्चा होत आहे. दरम्यान, बुधवारी नियोजन विभागात स्थगितीबाबत चौकशी केली असता अद्याप शासन स्तरावरून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती मिळाली.

सत्कार समारंभातही दिले स्थानतुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी जवळपास २ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याअनुषंगाने गुरुवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आराखडा मंजुरीसाठी पाठपुरावा करणारे स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच आराखडा समितीचे अध्यक्ष पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा नागरी सत्कार होत आहे. सरनाईक यांचा दौरा उशिरापर्यंत निश्चित झालेला नव्हता. मात्र, या सत्कार समारंभाच्या माध्यमातून दिलजमाईचाही प्रयत्न दिसून येत आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवAjit Pawarअजित पवार