शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

एसटीचे स्वच्छतेकडे होतेय दुर्लक्ष ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास समजले जाते. मात्र, कोरोना काळात बसेस अनेक महिने आगारात थांबून राहिल्याने बसेसची दुरवस्था ...

उस्मानाबाद : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास समजले जाते. मात्र, कोरोना काळात बसेस अनेक महिने आगारात थांबून राहिल्याने बसेसची दुरवस्था झाली. काही बसेसचा पत्रा खिळखिळा झाला आहे. त्यामुळे रिमझिम पावसातही काही बसेला गळती लागत आहेत. शिवाय, बहुतांश बसेसची वेळोवेळी स्वच्छता राखली जात नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त केली जात आहे.

खाजगी वाहतूक सेवेला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन एसटी बसमध्ये सातत्याने बदल केले जात असतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे आजघडीला एसटी सेवा टिकून आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जात असल्याने प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. कोरोना काळात काही महिने बसेस आगारातच थांबून राहिल्याने अनेक बसेसची दुरवस्था झाली होती. महामंडळाने बसेसची डागडुजी केली आहे. बोटावर मोजण्याइतक्या बसेसचे पत्रे खराब आढळून येतात. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची स्वच्छता राखली जात नसल्याचे आढळून आले. प्रवाशांकडूनही बसच्या खिडक्या तसेच आसनाच्या शेजारीची थुंकत असतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करीत प्रवास करावा लागतो. बसेसची वेळोवळी साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

कोट...

कोरोना काळात दीड महिने बसेस बंद होत्या. नादुरुस्त बसची दुरुस्ती केली आहे. बसमध्ये थुंकणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असते. याबाबत वाहकांना सूचना देण्यात येणार आहेत.

पांडुरंग पाटील, आगार प्रमुख, उस्मानाबाद

एसटीचा कसरतीचा प्रवास

एसटी बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे. त्यामुळे खाजगी वाहनाऐवजी एसटीने प्रवासाला प्राधान्य देतो. मात्र, अनेक आसने धुळीने माखलेली असतात. रुमालाने ते स्वच्छ करुन बसावे लागते.

विशाल मस्के, प्रवासी

खाजगी वाहनात स्वच्छता असते. एसटीच्या लांब पल्ल्याच्या बसेस वगळता ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची स्वच्छता ठेवली जात नाही. खिडकी, आसन थुंकून घाण झालेले असते. एसटीने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.

पृथ्वीराज माने, प्रवासी

गाड्यांचा मेंटेनन्स वाढला, पण पैसा नाही

जिल्ह्यातील उस्मानाबाद, भूम, परंडा, कळंब, उमरगा, तुळजापूर या सहा आगाराच्या एकूण ४२२ बसेस असून, यापैकी सध्या ३३० बसेस सुरु आहेत. प्रतिदिन ७५ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून महामंडळास ३२ लाखाचे उत्पन्न मिळत आहे.

उस्मानाबाद आगाराच्या ७७ बसेस असून, या बसपैकी ७० बसेस दररोज धावत आहेत. आगारास ७ लाख रुपये उत्पन्न मिळते. डिझेलसाठी ६ लाख ५० हजार रुपये खर्च, पगारासाठी ४ लाख रुपये प्रतिदिन खर्च होतो. तर मेंटेनन्सला सुमारे ५० हजार रुपये खर्च करावे लागतात. उत्पन्न ७ लाख रुपये व खर्च ११ लाख रुपये होत आहे. अशीच स्थिती अन्य आगाराची आहे. सर्व बसेस सुरू झाल्यानंतर उत्पन्न वाढेल, अशी आशा एसटीला आहे.