शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

६० हजार रुपये खर्च, हाती दमडीही नाही; शेतकऱ्याने अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला!

By बाबुराव चव्हाण | Updated: May 6, 2023 16:00 IST

सांगवीतील शेतकरी हवालदिल; चार ते पाच रुपये किलाे दराने विकण्याची नामुष्की

तामलवाडी ( धाराशिव) : बाजारपेठेत कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. चार ते पाच रुपये किलाे एवढा अत्यल्प दर मिळत आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून काढणी आणि काटणीचाही खर्च निघत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील शेतकऱ्याने सुमारे दाेन एकरातील कांदा पिकावर कुळव फिरवून अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला.

शेतकरी ज्ञानदेव भानुदास मगर यांची सोलापूर- धुळे महामार्गालगत सांगवी काटी शिवारात शेतजमीन आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस त्यांनी दोन एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली हाेती. कांदा काढणीला येईपर्यंत सुमारे ६० हजार रुपये खर्च झाला. मात्र, कांदा बाजारपेठेत दाखल हाेताच दर काेसळले. सध्या प्रति किलाे चार ते पाच रुपये एवढा अत्यल्प दर मिळत आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून कांद्याची काढणी व काटणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मगर यांनी सुमारे दाेन एकर क्षेत्रातील पिकावर कुळव फिरवून थाेडाथाेडका नव्हे तर अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला. दरम्यान, सांगवी शिवारातील अन्य शेतकरीही हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी आणि उष्णतेमुळे काढणी झालेला कांदाही खराब हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे बाजारात दर मिळत नाही आणि दुसरीकडे कांदा टिकतही नसल्याने शेतकऱ्यांसमाेर माेठा प्रश्न निर्माण झाला आहे.

६० हजार रुपये खर्च, हाती दमडीही नाही...शेतकरी ज्ञानदेव मगर यांनी दाेन एकरातील कांदा पिकावर सुमारे ६० हजार रुपये खर्च केला. मात्र, बाजारपेठेत दर मिळत नसल्याने त्यांनी हा कांदा शेतातील मातीत गाडला. पदरमाेड हाेऊनही हाती दमडीही पडली नसल्याने शेतकरी मगर हवालदिल झाले आहेत. अशीच काहीशी अवस्था गावातील अन्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.

ना अनुदान, ना मदत...कांद्याचे दर घसरल्यानंतर सरकारने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, हे अनुदान बाजारात विक्री झालेल्या कांद्यासाठीच लागू आहे. मात्र, दुसरीकडे काढलेला कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही हाती पडत नसल्याने शेतकरी कांदा जमिनीत गाडू लागले आहेत. अशा शेतकऱ्यांना काेण मदत देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादagricultureशेतीonionकांदा