शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

मोबाईल रेंजसाठी कधी रस्त्यावर तर कधी डोंगरावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:34 AM

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) या गावात कोणत्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ, व्यापारी व ...

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) या गावात कोणत्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ, व्यापारी व विद्यार्थी यांचे मोठे हाल होत असून, रेंज मिळविण्यासाठी रस्त्यावर, डोंगरावर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

उमरगा (चि) हे जवळपास चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे विविध कंपनीच्या मोबाईलचे हजारो ग्राहक आहेत. परंतु, बीएसएनएलसह कुठल्याच खाजगी मोबाईल कंपनीचे गावात टॉवर नाही. गावापासून सात-आठ किमी अंतरावर असलेल्या अणदूर, चिवरी येथे टॉवर असले तरी अंतर जास्त असल्यामुळे येथून तिथपर्यंत व्यवस्थित रेंज पोहोचू शकत नाही. अधून-मधून रेंज मिळत असल्यामुळे नागरिकांना शेतात, उंचवट्याचा आधार घ्यावा लागत आहे.

कोविडच्या महामारीत शासनाने विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन शिक्षण बंद केले व ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केली. पण गावात नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला व्यत्यय येत आहे. त्यामुळे शिक्षकांना यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन गुणवत्तेचा दर्जा ढासळत आहे. कोणत्याही शासकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी देखील आता ऑनलाईन फॉर्म भरावे लागत आहेत. त्यामुळे, शासनाच्या योजनांचा लाभ घेतानाही ग्रामस्थांना मोठ्या अडचणी येत आहेत. नेटवर्कअभावी वेळेत पीक विमा न भरता आल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांनी उमरगा (चि) येथे टाॅवर उभे करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

चौकट......

गावात टाॅवर उभे करण्यासाठी विविध कंपन्यांशी आम्ही मेलद्वारे संपर्क केला. परंतु, कोणत्याच कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही. टाॅवरच्या उभारणीसाठी स्वत:ची जागा देण्याचीही तयारी आहे. फक्त कंपनीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

- आसिफ नूरमहमद शेख, ग्रामस्थ

माझ्याकडे दोन सिमकार्ड आहेत. परंतु, एकाही कंपनीची रेंज व्यवस्थित मिळत नाही. वारंवार कस्टमर केअरला तक्रारीसाठी संपर्क करतोय. परंतु, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. आमचा व्यवसाय मोबाईलवरच अवलंबून आहे. त्यामुळे कुठल्या तरी कंपनीने टॉवर उभारणीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- गणेश पोतदार, व्यावसायिक

गावामध्ये रेंज येत नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. संबंधित कंपनीला ग्रामपंचायतीच्यावतीने अर्ज देऊन टाॅवरची मागणी करणार आहोत. कंपनीने सहमती दर्शवली तर ग्रामपंचायत टाॅवर उभारण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून देईल.

- गोरोबा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी, उमरगा (चि)

गावांमध्ये कुठल्याही मोबाईलला रेंज येत नाही. सध्या ऑफलाईन शिक्षण बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय निवडला होता. परंतु, रेंज नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी व्यत्यय येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

- विठ्ठल जेटीथोर, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला