शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

विद्यापीठ निर्मितीचे भिजत घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST

उस्मानाबाद : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात चार महिन्यांपूर्वी समिती स्थापन करण्याचे निर्देश ...

उस्मानाबाद : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात चार महिन्यांपूर्वी समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. मात्र, आजतागायत ही समितीच स्थापन झाली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आल्याने विद्यापीठ निर्मितीचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे.

उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. विद्यापीठासाठी आवश्यक असणारी जमीन, भौतिक सुविधा याठिकाणी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या मागणीला अधिक जोर आला आहे. दरम्यान, ही मागणी लक्षात घेऊन खासदार ओम राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी पुढाकार घेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे या विषयावर ऑगस्टमध्ये बैठकही लावण्यात आली होती. या बैठकीत तातडीने माजी कुलगुरू एस. एन. माळी यांच्या अध्यक्षतेखाली डी. टी. शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्य डॉ. अनार साळुंखे, शिक्षणतज्ज्ञ एम. डी. देशमुख, सिनेट सदस्य संजय निंबाळकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी दिल्या होत्या. मात्र, आजतागायत यावर कसलीही कार्यवाही झालेली नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. उस्मानाबाद येथील शीतल वाघमारे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे या समितीबाबतची माहिती मागितली होती. या विभागाने विद्यापीठाकडे चेंडू टोलवून तेथून माहिती देण्यास सांगितले. नुकतेच यावर विद्यापीठाने उत्तर दिले असून, अशी कुठलीही समिती स्थापन केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे विद्यापीठ निर्मितीचे घोंगडे अजूनही भिजतच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोट...

आपण स्वत:ही विद्यापीठ निर्मितीबाबत सातत्याने प्रयत्न करत आहोत. येथील खासदार व आमदारांनी याप्रश्नी पुढाकार घेऊन मंत्र्यांकडे बैठक लावण्यास भाग पाडले होते. मात्र, बैठकीत ठरल्याप्रमाणे अद्याप काहीच घडलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी याकडे लक्ष देऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-संजय निंबाळकर, सिनेट सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद