... तर एका कारखान्यावर जिल्हा होईल स्वयंपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST2021-05-08T04:34:51+5:302021-05-08T04:34:51+5:30
कळंब : तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव कारखान्याकडून युद्धपातळीवर ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पाची शुक्रवारी पालकमंत्री शंकरराव गडाख ...

... तर एका कारखान्यावर जिल्हा होईल स्वयंपूर्ण
कळंब : तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव कारखान्याकडून युद्धपातळीवर ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पाची शुक्रवारी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पाहणी केली. यावेळी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दररोज २० टन ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता असल्याचे सांगितले. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू झाल्यास ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होणार आहे.
चारोखळी येथील धाराशिव कारखान्याचा ऑक्सिजन प्रकल्प हा देशातील पहिलाच ठरला आहे. राज्यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातही रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत धाराशिव कारखान्याने पुढाकार घेत, युद्धपातळीवर ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम सुरू केले आहे. शुक्रवारी पालकमंत्र्यांनी या प्रकल्पाची पाहणी करून कारखान्याच्या या प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवळे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, औषध निरीक्षक विलास दुसाने उपस्थित होते.
प्रतिदिन २० टन ऑक्सिजन...
धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी यावेळी पालकमंत्री शंकरराव गडाख यांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या निर्मितीचा प्रवास सांगितला. यावेळी पालकमंत्र्यांनी पाटील यांच्याकडून प्रकल्पातील घटक व प्रक्रिया जाणून घेतली. या प्रकल्पात दररोज २० टन ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. यासाठी प्रकल्प सज्ज झाला आहे. जिल्ह्यास दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी हा प्रकल्प मोठी भूमिका बजावणार आहे.