शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दमदार पावसामुळे सीना-कोळेगाव धरण १०० टक्के भरण्याची शक्यता; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 18:58 IST

Sina-Kolegaon dam likely to fill 100 per cent due to heavy rains नदीकाठची जनावरे, घरे हलविण्याबाबत दवंडीद्वारे दिली सूचना

ठळक मुद्देप्रशासनाकडून नदीत पाणी सोडण्याची तयारी सुरूप्रकल्पात पाण्याची जोरदार आवक सुरू आहे

परंडा : गेल्या तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील साकत मध्यम प्रकल्प वगळता सर्व प्रकल्पांचे सांडवे दुधडी भरून वाहत आहेत. तर सीना-कोळेगाव प्रकल्पात येणाऱ्या सीना व खैरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत सीना-कोळेगाव धरण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

आठवडाभरापूर्वीच तालुक्यातील खासापुरी, चांदणी, मध्यम प्रकल्प व निम्न खैरी, तांबेवाडी, बृहत प्रकल्प भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तर साकत मध्यम प्रकल्प अद्यापही अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. भूम, खर्डा, जामखेड, नगर, येरमाळा येथे आठवडाभर झालेल्या दमदार पावसाने कृष्णा खोरे अंतर्गत असलेले सर्व मध्यम प्रकल्प, बृहत प्रकल्प, साठवण तलाव, लघू सिंचन तलाव भरले असून, सीना-कोळेगाव प्रकल्पही दमदार पावसाने मंगळवारी सायंकाळी १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.

सोमवारी दुपारपर्यंत सीना-कोळेगाव प्रकल्पात ९२ टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्प भरण्याची पूर्ण शक्यता असल्याने पाटबंधारे खात्याने प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीत करण्याची तयारी सुरू केली आहे. खबरदारी म्हणून प्रकल्पाखालील सीना काठच्या भोत्रा, आवाटी, रोसा, मुंगशी आदी गावांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रात कधीही पाणी सोडले जाईल त्यामुळे पात्रातील विद्युत मोटारी, शेती साहित्य शेतकऱ्यांनी काढून घ्यावेत. तसेच नदी काठावरील जनावरे, घरे इतरत्र हलवावीत, अशी दवंडी देण्यात आली आहे.

प्रकल्पात पाण्याची जोरदार आवक सुरू आहेमागील दोन दिवस खर्डा, जामखेड, तांदुळवाडी, शेळगाव भागात झालेल्या दमदार पावसाने खैरी नदीला पूर आला असून, तांदुळवाडी व शेळगाव येथील पुलावरून पाणी वहात आहे. तसेच नगर जिल्ह्यात झालेल्या पावसाने सीना नदी व जामखेड तालुक्यातून येणारी विंचरणा ही तिची उपनदी दुथडी भरून वहात आहे. यामुळे सीना-कोळेगाव प्रकल्पात सध्या सर्वच मार्गाने पाण्याची जोरदार आवक सुरू आहे.  

कोरडवाहू शेतकरी चिंताग्रस्तयावर्षी जोरदार पाऊस झाला असून, अद्यापही खरिपाच्या राशी खोळंबल्या आहेत. वाफसा न झाल्याने रबीची विशेषत: पांढऱ्या शुभ्र दाणेदार ज्वारीची पेरणी थांबली असून, रबी हंगाम लांबला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तर दमदार पावसाने सर्व प्रकल्प, तलाव तुडूंब भरल्याने ऊस लागवडसाठी बागायतदारांची धावपळ सुरू आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊसOsmanabadउस्मानाबाद