शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पावसाने सडला कांदा, शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 17:56 IST

सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील जेजला शिवारात लागवड केलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक धोक्यात आले आहे.  अतिपावसामुळे कांद्याचे पीक सडले असून रबीसाठी तयार केलेली रोपेही या पावसामुळे जळून गेल्याने आता नविन लागवडीसाठी मोठीच अडचण निर्माण झाली आहे.

पाथरुड : सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील जेजला शिवारात लागवड केलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक धोक्यात आले आहे.  अतिपावसामुळे कांद्याचे पीक सडले असून रबीसाठी तयार केलेली रोपेही या पावसामुळे जळून गेल्याने आता नविन लागवडीसाठी मोठीच अडचण निर्माण झाली आहे.

भूम तालुक्यातील जेजला येथील जवळपास ७० टक्के शेतकरी दरवर्षी खरीप व रबी हंगामात कांद्याची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. त्यामुळे कांद्याचे कोठार म्हणून तालुक्यात जेजला गावची ओळख आहे. जेजला येथील एकूण ८४७ हेक्टर क्षेत्रापैकी  ३५० ते ४०० हेक्टर म्हणजेच जवळपास ७० टक्के क्षेत्रावर खरीप, रबी हंगामात कांद्याचे पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच सतत पाऊस पडत असल्याने व गेल्या १५ दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामात जुलै, ऑगस्ट महिन्यात लागवड केलेला जवळपास १५० हेक्टरवरील कांद्यासह रबी हंगामात जवळपास २५० हेक्टर लागवड होणाऱ्या कांद्याची रोपे पावसाने सडून गेली. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

त्यातच कांदा बियाणाचे दर प्रतीकिलो ३ हजार ५०० रूपयांवर गेल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. उडीद काढणीनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. परंतु यावर्षी रोपेच वाया गेल्याने अनेक शेतकऱ्यांना कांद्याऐवजी ज्वारी, गहू, हरभरा या रबी हंगामातील पिकांचा पर्याय शोधावा लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूरRainपाऊसonionकांदा