शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

पावसाने सडला कांदा, शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 17:56 IST

सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील जेजला शिवारात लागवड केलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक धोक्यात आले आहे.  अतिपावसामुळे कांद्याचे पीक सडले असून रबीसाठी तयार केलेली रोपेही या पावसामुळे जळून गेल्याने आता नविन लागवडीसाठी मोठीच अडचण निर्माण झाली आहे.

पाथरुड : सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील जेजला शिवारात लागवड केलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक धोक्यात आले आहे.  अतिपावसामुळे कांद्याचे पीक सडले असून रबीसाठी तयार केलेली रोपेही या पावसामुळे जळून गेल्याने आता नविन लागवडीसाठी मोठीच अडचण निर्माण झाली आहे.

भूम तालुक्यातील जेजला येथील जवळपास ७० टक्के शेतकरी दरवर्षी खरीप व रबी हंगामात कांद्याची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. त्यामुळे कांद्याचे कोठार म्हणून तालुक्यात जेजला गावची ओळख आहे. जेजला येथील एकूण ८४७ हेक्टर क्षेत्रापैकी  ३५० ते ४०० हेक्टर म्हणजेच जवळपास ७० टक्के क्षेत्रावर खरीप, रबी हंगामात कांद्याचे पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच सतत पाऊस पडत असल्याने व गेल्या १५ दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामात जुलै, ऑगस्ट महिन्यात लागवड केलेला जवळपास १५० हेक्टरवरील कांद्यासह रबी हंगामात जवळपास २५० हेक्टर लागवड होणाऱ्या कांद्याची रोपे पावसाने सडून गेली. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

त्यातच कांदा बियाणाचे दर प्रतीकिलो ३ हजार ५०० रूपयांवर गेल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. उडीद काढणीनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. परंतु यावर्षी रोपेच वाया गेल्याने अनेक शेतकऱ्यांना कांद्याऐवजी ज्वारी, गहू, हरभरा या रबी हंगामातील पिकांचा पर्याय शोधावा लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूरRainपाऊसonionकांदा