शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सौंदाना, वाकडी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 7:02 PM

गावाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी संबंधित विभागाकडे गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे

ठळक मुद्दे ग्रामसभेत घेतला ठराव रस्त्यासह इतर प्रश्न सुटत नसल्याने घेतला निर्णय

कळंब ( उस्मानाबाद ) : गत दोन दशकांपासून गावाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्याची सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील सौंदना (अंबा) व वाकडी (ई) या गावातील ग्रामस्थांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह इतर सर्वच निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेत दोन्ही गावांनी हा एकमुखी निर्णय घेतला.

कळंब तालुक्यातील सौंदना अंबा व वाकडी (ई़) ही दोन गावे उस्मानाबादच्या टोकावरील आहेत़ मांजरा नदीच्या काठावर स्थिरावलेल्या यातील सौंदना गावाची जेमतेम दीड हजार तर वाकडी गावाची एक हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे़ मांजरामायच्या कृपेने गावशिवारत चांगली सुबत्ता असली तरी रहदारीचा रस्ता मात्र कायम मागसलेला. लातूर-कळंब या राज्यमार्गावरून सौंदना (अंबा) व वाकडी (ई) या गावांना जोडणारा एक रस्ता कसाबसा झाला खरा परंतु, गत दोन दशकापेक्षा जास्त कालावधीपासून या रस्त्याची  ‘खड्डयात रस्ता की  रस्त्यात खड्डे’ अशी गत झालेली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या साधारणत: पाच किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर खड्ड्यांची मोठी घनता वाढली आहे. यामुळे ये-जा करतांना नाकीनऊ येत आहे. या खराब रस्त्यामुळे गावात ना राज्य परिवहन महामंडळाची बस येते ना, इतर वाहने सहजासहजी धावतात़ त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, रूग्ण यांना त्रास सहन करावा लागत आहे़ तसेच नित्य ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनाही दणक्यात प्रवास करावा लागत आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सौंदना (अंबा) व वाकडी (ई) येथील ग्रामस्थांनी आगामी होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह इतर सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सौंदना अंबा येथे सरपंच डी.बी. देवकते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला़ रमेश पालकर यांनी हा ठराव मांडला तर रमेश गायकवाड यांनी अनुमोदन दिले़ तसेच वाकडी (ई) येथे संजय महानवर सुचक असलेला ठराव संमत करण्यात आला. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन गावातील नागरिकांनी मतदानवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे़

वारंवार मागणी करूनही दुर्लक्षगावाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी संबंधित विभागाकडे गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. यासंबधी निवेदन, तक्र ही देण्यात आली़ परंतु, कोणताही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी या समस्याकडे लक्ष देत नाही़ त्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आगामी निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या ठरावाची प्रत व निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे सौंदना अंबा येथील सामाजीक कार्यकर्ते कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकroad safetyरस्ते सुरक्षाOsmanabadउस्मानाबाद