शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

जिल्ह्यात १४९१ व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १४९१ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार उद्योग, तसेच व्यवसाय सुरू करून देण्याचा संकल्प ...

उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १४९१ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार उद्योग, तसेच व्यवसाय सुरू करून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला आहे, अशी माहिती भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

कोविड महामारी व त्यामुळे उद्भवलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये, या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत देशातील जवळपास ८० कोटींहून अधिक जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत दरमहा ५ किलो मोफत धान्य देण्याचे अभियान राबविले. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू करण्यात आलेली ही योजना पुढे दुसऱ्या लाटेतही कायम ठेवून येणारी दिवाळी म्हणजे नोव्हेंबर, २०२१ पर्यंत राबविण्याची घोषणा केली आहे, तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ ही केवळ घोषणाच न करता अनेक योजना जाहीर करत त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. दरम्यान, १२ सप्टेंबर राेजी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे शक्तिकेंद्र व बूथप्रमुख यांच्या ऑडिओब्रिजद्वारे झालेल्या बैठकीत प्रत्येक बूथमधील किमान एका नागरिकाला त्याच्या गरजे व इच्छेनुसार उद्योग तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा निर्णय झाला. प्रधानमंत्री स्वनिधी, ई-मुद्रा, कृषीवर आधारित उद्योग, एमएसएमई, डीआयसीमार्फत चालविण्यात येणारे उद्योग, तसेच छोटे-मोठे व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी अथवा सुरू उद्योगांमध्ये वृद्धी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. सर्वच जाती- धर्मांच्या नागरिकांना या योजनांच्या माध्यमातून ५ ते ६० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे, तसेच बँकांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित बूथप्रमुख क्रियाशील राहतील. त्यामुळे या याेजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.