शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

उस्मानाबादकरांना दिलासा, जिल्ह्यातील १०० प्रकल्प ओव्हरफ्लो

By सूरज पाचपिंडे  | Updated: September 8, 2022 17:34 IST

उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा १, मध्यम १७, लघु २०८, असे एकूण २२६ प्रकल्प आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यात जुलै महिन्यापासून सर्वत्र पाऊस सक्रिय झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांपैकी १०० प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत, २६ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक तर २२ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा १, मध्यम १७, लघु २०८, असे एकूण २२६ प्रकल्प आहेत. प्रकल्पाची साठवण क्षमता ७२६.९६२ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पातून अनेक शहरे व गावांना पाणीपुरवठा होता. जून महिन्यात जिल्ह्यातील काहीच भागांत दमदार पाऊस झाला, तर काही भागांत पावसाने पाठ फिरविल्याने जूनअखेरीस केवळ एक प्रकल्प भरला होता. ११ प्रकल्प कोरडेठाक होते. मात्र, जुलै महिन्यात सर्वच भागात पाऊस सक्रिय झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली. ऑगस्ट महिन्यातही काही भागांत पाऊस झाला.

परिणामी, १८ ऑगस्टपर्यंत ८० प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात पाणीसाठा वाढू लागला आहे. ८ सप्टेंबर १०० प्रकल्प तुडूंब भरले आहेत. २६ प्रकल्पात ७५ टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. २२ प्रकल्पात २६ ते ५० टक्के, २५ प्रकल्पात २६ ते ५० टक्के, ४० प्रकल्पात ४० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पात ४४६.५९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ६१.४३ इतकी आहे.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबाद