शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

इंदापूर येथे पाण्यासाठी रोखला राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:01 IST

वाशी तालुक्यातील इंदापूर येथील अनेक महिलांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले़

इंदापूर (उस्मानाबाद ) : पाणीटंचाईमुळे संतापलेल्या झालेल्या वाशी तालुक्यातील इंदापूर येथील अनेक महिलांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले़ गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी आक्रमक मागणी यावेळी महिलांसह ग्रामस्थांनी लावून धरली होती़

सहा हजार लोकसंख्येच्या इंदापूर गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामपंचायतीच्या १० पैकी केवळ २ हातपंपांना पाणी येते़ अपुऱ्या पावसामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ गावातील तीव्र पाणीटंचाई पाहता मनसेच्या वतीने यापूर्वी इंदापुरातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता़ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमवेत गुरूवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीपाी जवळ रास्तारोको आंदोलन केले़

यावेळी घागरी हातात घेऊन अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़ यावेळी मनसे महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली गायकवाड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, सरपंच लक्ष्मी शिंदे, स्वाती गपाट, दत्ता बोंदर, बळीराज चेडे आदींनी मनोगत व्यक्त करीत शासन, प्रशासनाच्या कारभारावर टीका केली़ इंदापूर गावासाठी नांदगाव साठवण तलावातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी सर्वांनी लावून धरली होती़ तासभराच्या आंदोलनानंतर वाशी ठाण्याचे पोनि सतीश चव्हाण यांनी आंदोलकांना निवेदन देऊन आंदोलन थांबविण्याबात सूचित केले़

मात्र, निवेदन स्विकारण्यासाठी मंडळ अधिकारी आल्याचे पाहून महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ जोपर्यंत तहसीलदार येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़ त्यानंतर नायब तहसीलदार यादव यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांचे म्हणणे जाणून घेत निवेदन स्विकारले़ तसेच टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचे व ग्रामस्थांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले़ यावेळी मनसेचे सुरेश पाटील, दत्ता बोंदर, संतोष बारकूल, रोहिदास मारकड, वसंत बारकूल यांच्यासह ग्रामस्थ, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या़

इंदापूर-गेलेगाव योजना बंदशासनाने सन १९९५-९६ मध्ये घोडकी तलावातून इंदापूर, गोलेगाव संयुक्त पाणीपुरवठा योजना राबविली होती़ साधारणत: नऊ कोटी पाच लाख रूपये खर्च करून राबविलेली ही योजना बंद  पडली आहे़ ही योजना बंद पडल्याने गावातील पाणीप्रश्न अधिकच बिकट होत आहे़

टॅग्स :agitationआंदोलनWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद