शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक : राणा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 09:42 IST

राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी ८ हजार रुपये मदतही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

उस्मानाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. कर्जमाफी योजनेची अद्याप अंमलबजावणी नाही. पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. तसेच राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असल्याचा आरोप करत भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

पाटील म्हणाले की, या सरकारने किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. मात्र, सध्याचे चित्र पाहिल्यानंतर हा कार्यक्रम कुठेच दिसून येत नाही. मंत्रिमंडळातील प्रत्येक जण वेगळच काही तरी बोलत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर या मागणीचा त्यांना विसर पडला असल्याच पाटील म्हणाले.

राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी ८ हजार रुपये मदतही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आजवर शेतकऱ्यांना विमा मिळणे अपेक्षित होते. परंतु याबाबतही सरकारमधील मंडळी चकार शब्द काढायला तयार नाहीत. जी कर्जमाफी जाहीर केली आहे, त्यातही अटी-शर्थीचा भरणा आहे. या योजनेतून केवळ दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. उर्वरित शेतक-यांनाही दिलासा देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही कुठलीही योजना जाहीर झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असतानाही अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जाताना दिसत नाहीत. एकूणच या सरकारचा कारभार सर्वसामान्यांची निराशा करणारा आहे. त्यामुळे अशा सरकारला जाब विचारण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा तसेच तहसील स्तरावर सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.