शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक : राणा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 09:42 IST

राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी ८ हजार रुपये मदतही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

उस्मानाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. कर्जमाफी योजनेची अद्याप अंमलबजावणी नाही. पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. तसेच राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असल्याचा आरोप करत भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

पाटील म्हणाले की, या सरकारने किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. मात्र, सध्याचे चित्र पाहिल्यानंतर हा कार्यक्रम कुठेच दिसून येत नाही. मंत्रिमंडळातील प्रत्येक जण वेगळच काही तरी बोलत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर या मागणीचा त्यांना विसर पडला असल्याच पाटील म्हणाले.

राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी ८ हजार रुपये मदतही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आजवर शेतकऱ्यांना विमा मिळणे अपेक्षित होते. परंतु याबाबतही सरकारमधील मंडळी चकार शब्द काढायला तयार नाहीत. जी कर्जमाफी जाहीर केली आहे, त्यातही अटी-शर्थीचा भरणा आहे. या योजनेतून केवळ दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. उर्वरित शेतक-यांनाही दिलासा देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही कुठलीही योजना जाहीर झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असतानाही अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जाताना दिसत नाहीत. एकूणच या सरकारचा कारभार सर्वसामान्यांची निराशा करणारा आहे. त्यामुळे अशा सरकारला जाब विचारण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा तसेच तहसील स्तरावर सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.