शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक : राणा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 09:42 IST

राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी ८ हजार रुपये मदतही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

उस्मानाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. कर्जमाफी योजनेची अद्याप अंमलबजावणी नाही. पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. तसेच राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असल्याचा आरोप करत भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

पाटील म्हणाले की, या सरकारने किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. मात्र, सध्याचे चित्र पाहिल्यानंतर हा कार्यक्रम कुठेच दिसून येत नाही. मंत्रिमंडळातील प्रत्येक जण वेगळच काही तरी बोलत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर या मागणीचा त्यांना विसर पडला असल्याच पाटील म्हणाले.

राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी ८ हजार रुपये मदतही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आजवर शेतकऱ्यांना विमा मिळणे अपेक्षित होते. परंतु याबाबतही सरकारमधील मंडळी चकार शब्द काढायला तयार नाहीत. जी कर्जमाफी जाहीर केली आहे, त्यातही अटी-शर्थीचा भरणा आहे. या योजनेतून केवळ दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. उर्वरित शेतक-यांनाही दिलासा देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही कुठलीही योजना जाहीर झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असतानाही अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जाताना दिसत नाहीत. एकूणच या सरकारचा कारभार सर्वसामान्यांची निराशा करणारा आहे. त्यामुळे अशा सरकारला जाब विचारण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा तसेच तहसील स्तरावर सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.