चार दिवसांपासून वीजपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST2021-04-17T04:32:03+5:302021-04-17T04:32:03+5:30
येडशी : वादळी वाऱ्यात डीपीवर झाड कोसळल्याने कळंब तालुक्यातील पाच गावांचा वीजपुरवठा मागील चार दिवसांपासून बंद आहे. यामुळे येथील ...

चार दिवसांपासून वीजपुरवठा बंद
येडशी : वादळी वाऱ्यात डीपीवर झाड कोसळल्याने कळंब तालुक्यातील पाच गावांचा वीजपुरवठा मागील चार दिवसांपासून बंद आहे. यामुळे येथील ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मंगळवारी अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात सातेफळ, हळदगाव, सौंदणा, एरंडगाव, जवळा या गावाला वीजपुरवठा करणाऱ्या डीपीवर झाड कोसळले. त्यामुळे तेव्हापासून या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सद्यस्थितीत विजेअभावी ग्रामस्थांसोबतच जनावरांच्यादेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावात निर्माण झाला आहे. शिवाय, विजेवर चालणारे सर्व व्यवसाय ठप्प असून, ग्रामस्थांना इतरही अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरू करून ग्रामस्थांचे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.
कोट....
गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असून, वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा अद्याप सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांसोबतच जनावरांचेदेखील पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. विजेअभावी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- ऋषिकेश क्षीरसागर, सातेफळ