शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

निकृष्ट कामाचा फटका! भूममध्ये पाझर तलाव फुटल्याने 150 एकर शेती उद्ध्वस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:32 IST

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी

- संतोष वीर

भूम (धाराशिव): भूम शहरातील साबळेवाडी येथे 14 वर्षांपूर्वी बांधलेला एक पाझर तलाव आज दुपारी अचानक फुटला. या दुर्घटनेमुळे सुमारे 150 एकर शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाचे योग्य नियोजन न झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 3 वाजता हा पाझर तलाव अचानक फुटला. जोरदार पावसामुळे तलावात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते, मात्र योग्य सांडवा नसल्याने पाण्याचा दाब वाढला आणि तलावाचा बंधारा फुटला. यामुळे तलावातील दगड आणि गाळ मोठ्या वेगाने शेतात पसरला, ज्यामुळे उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

नदीकाठी घबराट आणि प्रशासनाची धावपळ

​तलावाचे पाणी शहरातील लेंडी नदीपात्रात अचानक मोठ्या प्रवाहाने येऊ लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नदीचा प्रवाह काही मिनिटांतच वाढल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना तलावापर्यंत पोहोचता आले नाही.

​सध्या नदीचा प्रवाह नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तलाव फुटण्याची कारणे शोधण्यासाठी चौकशी सुरू असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली

​या घटनेने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे. साबळेवाडी येथील शेतकरी रणजीत साबळे यांनी सांगितले की, "तलावाच्या निकृष्ट कामामुळे आज आमच्या 150 एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी." या दुर्घटनेमुळे इतरही पाझर तलावांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवWaterपाणीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र