शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

पालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:35 IST

कळंब : नगर परिषद निवडणुकीची तयारी प्रशासन स्तरावर सुरू झाल्याने आता शहरातील राजकीय वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे. या ...

कळंब : नगर परिषद निवडणुकीची तयारी प्रशासन स्तरावर सुरू झाल्याने आता शहरातील राजकीय वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत कळंबमध्ये चार प्रमुख पक्षांतच लढत होण्याची अपेक्षा असून, आघाडीचा प्रयोग झाला, तर ही लढत अटीतटीची होऊ शकते.

कळंब नपवर सध्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक, तर काँग्रेसचे ६ नगरसेवक निवडून आले. शिवसेना व भाजप यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. सध्या नपमधील विरोधात असलेले शिवसेनेचे नगरसेवक निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी सेनेचा रस्ता धरल्याने त्यांना सेनेचे नगरसेवक मानले जाते. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीची निवडणुकीची सगळी सूत्रे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे होती. त्यांनी नियोजनबद्ध यंत्रणा राबवून राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. नपतील तत्कालीन सत्ताधारी मंडळींवरील नाराजीही राष्ट्रवादीला तेव्हा फायदेशीर ठरली होती. शिवसेना, भाजप राज्यात सत्तेत असूनही, शहरात करिश्मा दाखवू शकले नव्हते.

आता चित्र बदलले आहे. आ. पाटील हे भाजपवासी झाले आहेत. शहरातील त्यांच्या बहुतांश समर्थकांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे शहरात भाजपचे संघटन मजबूत असल्याचे मानले जाते. मात्र, भाजपचा मतदार कमी असल्याने पक्षाला मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेली शिवाजी कापसे यांची टीमही आता शिवसेनेत कार्यरत झाली आहे. त्यांनाही विरोधात असताना काय केले याचा हिशोब मांडावा लागणार आहे. पाच वर्षांच्या सत्ताकाळात नपमध्ये राष्ट्रवादीची बाजू एकहाती सांभाळणाऱ्या संजय मुंदडा यांच्या गाठीशी नपतील मोठ्या प्रमाणात झालेली विकास कामे आहेत; पण यंदा पाठीशी आ. राणादादा नसल्याने भौतिक यंत्रणा उभी करण्याचे आवाहन राहणार आहे. राष्ट्रवादीचा मतदार स्थिर असला तरी नवीन मतदारांनाही त्यांना खेचून घ्यावे लागणार आहे.

मागील निवडणुकीत शिवसेनेचा चेहरा असलेले पांडुरंग कुंभार यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसची नपतील जबाबदारी कुंभार यांच्या खांद्यावर आहे. शहरातील विस्कटलेली टीम, भरकटलेले कार्यकर्ते गोळा करून काँग्रेसला पुन्हा नपमध्ये प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. एकूणच नप निवडणुकीची प्रशासन स्तरावर तयारी सुरू झाली असताना राजकीय गोटातही हालचाली सुरू झाल्या आहेत. वाॅर्डरचना झाल्यानंतर व आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार निश्चित होतील; पण तोपर्यंत चर्चेची गुऱ्हाळे मात्र जोरात चलणार आहेत, असे चित्र सध्या दिसत आहे.