शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

राज्यातील भाजप नेत्यांमुळे माेदींना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय: मनाेज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 17:01 IST

लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली.

धाराशिव : मराठा समाज भाजपाच्या विराेधात कधीच नव्हता. विराेधात असता तर १०५ जागा उगीच निवडून आल्या का? राज्यातील स्थानिक नेत्यांच्या मराठा द्वेषामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय, असे मत मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी मांडले.

नारायणगड येथे हाेणाऱ्या मराठा समाजाच्या महासभेच्या प्रचाररथाच्या उद्घाटनासाठी ते साेमवारी सायंकाळी धाराशिव शहरात आले हाेते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी मराठा समाजाने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.

जरांगे-पाटील म्हणाले, लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते मराठ्यांचा द्वेष करतात. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना राज्यात तळ ठाेकावा लागताेय. इतक्या सभा घ्याव्या लागताहेत. लाेकसभेच्या प्रचारासाठी इतका वेळ माेदी यांनी महाराष्ट्रासाठी कधी दिला नव्हता. मराठ्यांच्या एकजुटीला घाबरून ही वेळ आली आहे. इथेच मराठे जिंकले आहेत. 

यानंतरही सगेसाेयरे व मराठा-कुणबी एकच असल्याचा आदेश पारित केला नाही तर यापेक्षाही जास्त वाईट वेळ येईल, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाने भाजपाला सत्ता दिली. मात्र, याच सत्तेत आमच्या आई-बहिणीचे डाेके फाेडले गेले. गुन्हे नाेंदविणे सुरूच आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर विधानसभा ताकदीने लढविणार आहाेत. महिनाभरापूर्वीच तशी तयारीही सुरू केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी मराठा बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Osmanabadउस्मानाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील