शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील भाजप नेत्यांमुळे माेदींना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय: मनाेज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 17:01 IST

लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली.

धाराशिव : मराठा समाज भाजपाच्या विराेधात कधीच नव्हता. विराेधात असता तर १०५ जागा उगीच निवडून आल्या का? राज्यातील स्थानिक नेत्यांच्या मराठा द्वेषामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय, असे मत मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी मांडले.

नारायणगड येथे हाेणाऱ्या मराठा समाजाच्या महासभेच्या प्रचाररथाच्या उद्घाटनासाठी ते साेमवारी सायंकाळी धाराशिव शहरात आले हाेते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी मराठा समाजाने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.

जरांगे-पाटील म्हणाले, लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते मराठ्यांचा द्वेष करतात. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना राज्यात तळ ठाेकावा लागताेय. इतक्या सभा घ्याव्या लागताहेत. लाेकसभेच्या प्रचारासाठी इतका वेळ माेदी यांनी महाराष्ट्रासाठी कधी दिला नव्हता. मराठ्यांच्या एकजुटीला घाबरून ही वेळ आली आहे. इथेच मराठे जिंकले आहेत. 

यानंतरही सगेसाेयरे व मराठा-कुणबी एकच असल्याचा आदेश पारित केला नाही तर यापेक्षाही जास्त वाईट वेळ येईल, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाने भाजपाला सत्ता दिली. मात्र, याच सत्तेत आमच्या आई-बहिणीचे डाेके फाेडले गेले. गुन्हे नाेंदविणे सुरूच आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर विधानसभा ताकदीने लढविणार आहाेत. महिनाभरापूर्वीच तशी तयारीही सुरू केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी मराठा बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Osmanabadउस्मानाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील