शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

‘एसटी’च्या उस्मानाबाद विभागाने वर्षभरात जमवला पावणेदोनशे कोटींचा गल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 16:58 IST

तब्बल सहा कोटी किलोमीटर केला प्रवास

उस्मानाबाद : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन शहरांसोबतच ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा आगारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. वर्षभरात एसटीने ६ कोटी १ लाख किलोमीटर रस्ता कापत सुमारे पावणेदोनशे कोटींचा गल्ला जमवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत गल्ल्यामध्ये दोन कोटींची जास्तीची भर पडली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ही ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे  मागील काही दशकांच्या तुलनेत खाजगी प्रवासी वाहतुकीचे जाळे विस्तारले असले तरी महामंडळाच्या बसचे महत्व आणि उपायोगिता आजही कायम आहे. महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत उस्मानाबाद, तुळजापूर, परंडा, भूम, कळंब आणि उमरगा हे सहा आगार येतात. या सर्वच आगारांकडून मागील दोन-तीन वर्षांपासून प्रवासी वाढविण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. प्रवास भाडे सवलत योजनाही राबविल्या जात आहेत. तसेच वातानुकुलित बससेवाही सुरू केली आहे.

या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणून की काय, दुरावलेले प्रवासी पुन्हा महामंडळाच्या सेवेकडे वळू लागले आहेत. त्यानुसार ‘एसटी’च्या गल्ल्यातही भर पडू लागली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा आगारांच्या ३९६ बसेसने ५ कोटी ९२ लाख ६१ हजार किलोमीअर रस्ता कापत पावणेदोनशे कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, २०१८-१९ या आर्थिक वर्षात उस्मानाबाद विभागाच्या ताफ्यात नव्याने सहा गाड्या दाखल झाल्या. त्यामुळे बसेसची संख्या ४०२ वर जावून ठेपली. या सर्व बसेसने मिळून ६ कोटी १ लाख ५ हजार किलोमीटर प्रवास केला. यातून १६७४ कोटी १६ लाख ५२ हजार रूपये एवढे उत्पन्न मिळाले. २०१७-१८ च्या तुलनेत महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या गल्ल्यात तब्बल दोन कोटींची जास्तीची भर पडली आहे. एवढे नाही तर बसेसने ८ लाख ४४ हजार किमीचा प्रवासही अधिक केला. उरोक्त आकडेवारी पाहता, कोणाला नसले आले तरी एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाला तर ‘अच्छे दिन’ आले, असे म्हटल्याच वावगे ठरणार नाही. 

कोणी किती जमवला गल्ला?उस्मानाबाद विभागातील तुळजापूर आगाराने ३७ कोटी ८६ लाख, उमरगा ३१  कोटी ७ लाख, भूम २४ कोटी १६ लाख, कळंब २९ कोटी ५१ लाख, परंडा ११ कोटी ९४ लाख तर उस्मानाबाद आगाराने २९ कोटी ६२ लाखांचा गल्ल जमवला आहे.  

कोणाचा किती प्रवास?उस्मानाबाद आगाराच्या ८२ बसेसने १ कोटी ३५ लाख, तुळजापूरच्या ८० बसगाड्यांनी  १ कोटी ३२ लाख, उमरग्याच्या ६५ बसेसने १ कोटी २ लाख, भूम ५९ बसगाड्यांनी ८३ लाख, कळंबच्या ७१ बसेसने १ कोटी १ लाख, तर परंडा आगाराच्या ३५ गाड्यांचा मिळून ४१ लाख किलोमीटर प्रवास झाला.

टॅग्स :state transportएसटीMONEYपैसाOsmanabadउस्मानाबाद