शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

उस्मानाबाद जिल्ह्यात ९२ हजार ग्रामस्थांना ४५ टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:49 IST

ग्रामीण भागातून अधिग्रहण, टँकरचे प्रस्तावही प्रशासनाकडे धडकू लागले आहेत़

ठळक मुद्देअधिग्रहणाची संख्या ३६५ वर

उस्मानाबाद : पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील ३४ गावातील ९२ हजार ७८७ ग्रामस्थांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ तर २५१ गावांसाठी ३६५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ वाढत्या पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातून अधिग्रहण, टँकरचे प्रस्तावही प्रशासनाकडे धडकू लागले आहेत़

पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट निर्माण झाला आहे़ प्रकल्प कोरडेठाक पडल्याने गावा-गावाच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत़ त्यात इतर जलस्त्रोतांनीही दम तोडल्याने पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत़ परिणामी प्रशासनाकडे टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत़ प्रशासनाने सध्या ३४ गावांसाठी ४५ टँकर सुरू केले आहेत़ तर एकूण २५१ गावांसाठी ३६५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

यात उस्मानाबाद तालुक्यातील ११ गावांसाठी १८ टँकर सुरू करण्यात आले आहेत़ टँकर भरण्यासाठी १९ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ६६ गावांसाठी १०३ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तुळजापूर ३६ गावांसाठी ६५ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ उमरगा तालुक्यातील एका गावात दोन टँकर सुरू आहेत़ टँकरसाठी २ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ७ गावांसाठी ९ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ लोहारा तालुक्यातील २० गावांसाठी २६ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ कळंब तालुक्यातील ७ गावांसाठी ९ टँकर सुरू आहेत़ टँकरसाठी ८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ३८ गावांसाठी ६० विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे

भूम तालुक्यातील ११ गावांसाठी १२ टँकर सुरू करण्यात आले आहेत़ टँकर भरण्यासाठी ८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ७ गावांसाठी ८ अधिग्रहणे तर वाशी तालुक्यातील १३ गावांसाठी १५ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ परंडा तालुक्यातील ४ गावांसाठी ४ टँकर तर हे टँकर भरण्यासाठी ४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ३१ गावांसाठी ३५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ ही परिस्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता भीषण होण्याची शक्यता आहे़

या गावात सुरू आहेत टँकरउस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बा़), रूई ढोकी, नांदुर्गा, खामगाव, येडशी, बेंबळी, ताकविकी, केशेगाव, करजखेडा, वाणेवाडी, उमरगा तालुक्यातील बेळंब, कळंब तालुक्यातील शिंगोली, ताडगाव, भाटशिरपुरा, देवळाली, मस्सा खंडेश्वरी, शेलगाव (ज़), पिंपळगाव (डो़), भूम तालुक्यातील वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरूड, सावरगाव, वारंवडगाव कासारी, गोरमाळा कृष्णपूर, आंबी, हिवर्डा, गोलेगाव, अंतरगाव तर परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी, मुगाव, कुक्कडगाव आदी गावांना टँकरचा आधार मिळत आहे़

टँकरच्या २८ खेपा कमीजिल्ह्यात सुरू असलेल्या ४५ टँकरच्या १२१ खेपा मंजूर आहेत़ प्रत्यक्षात ९३ खेपा झाल्या असून, २८ खेपा कमी झाल्या आहेत़ गावापासून दूर असलेले अधिग्रहण, अधिग्रहणाचे कमी झालेले पाणी, विजेचा अभाव आदी कारणांमुळे मंजुरीच्या प्रमाणात खेपा होत नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद