शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

उस्मानाबाद जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतही मिळणार पोषण आहार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 19:46 IST

पोषण आहारासोबतच उन्हाळी सुटीमध्ये दूध, अंडी आणि फळेही देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना विद्यार्थ्यांची माहिती शासनाला सादर

उस्मानाबाद : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणार्थ वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेत धडे गिरवणाऱ्या पहिली ते आठवीच्या वर्गातील सुमारे पावणेदोन लाखावर विद्यार्थ्यांना सुटीच्या काळातही पोषण आहार दिला जाणार आहे.

संपूर्ण पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्केच्या आसपास पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. अनेक प्रकल्प ऐन हिवाळ्यातच कोरडे पडले आहेत. ज्या काही प्रकल्पांत थोडाबहुत साठा आहे, तोही झपाट्याने कमी होत आहे. चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सरकारने सुरूवातील उमरगा आणि भूम वगळता उर्वरित सहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. भूम आणि उमरगा या तालुक्यातील जनतेने चोहोबाजुंनी दबाव आणल्यानंतर शासनाने दोनही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

टंचाई निवारणार्थ शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहावी, बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. यासोबतच आता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीमध्येही पोषण आहार देण्यात येणार आहे. तशा सूचना राज्य शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी शासनास सादर केली आहे. सदरील अहवालानुसार सुमारे १ हजारावर शाळांतील १ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहार पुरविला जाणार आहे. 

दुध, अंडी अन् फळेही देणारविद्यार्थ्यांना नियमित पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारासोबतच उन्हाळी सुटीमध्ये दूध, अंडी आणि फळेही देण्यात येणार आहेत, असे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. सुटीच्या काळात विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. सदरील कामांमध्ये कुचराई झाल्यास दोषींवर कारवाई करण्याबाबतही सरकारचे निर्देश आहेत.

टॅग्स :Usmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीdroughtदुष्काळOsmanabadउस्मानाबाद