शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

उस्मानाबाद जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतही मिळणार पोषण आहार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 19:46 IST

पोषण आहारासोबतच उन्हाळी सुटीमध्ये दूध, अंडी आणि फळेही देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना विद्यार्थ्यांची माहिती शासनाला सादर

उस्मानाबाद : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणार्थ वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेत धडे गिरवणाऱ्या पहिली ते आठवीच्या वर्गातील सुमारे पावणेदोन लाखावर विद्यार्थ्यांना सुटीच्या काळातही पोषण आहार दिला जाणार आहे.

संपूर्ण पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्केच्या आसपास पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. अनेक प्रकल्प ऐन हिवाळ्यातच कोरडे पडले आहेत. ज्या काही प्रकल्पांत थोडाबहुत साठा आहे, तोही झपाट्याने कमी होत आहे. चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सरकारने सुरूवातील उमरगा आणि भूम वगळता उर्वरित सहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. भूम आणि उमरगा या तालुक्यातील जनतेने चोहोबाजुंनी दबाव आणल्यानंतर शासनाने दोनही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

टंचाई निवारणार्थ शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहावी, बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. यासोबतच आता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीमध्येही पोषण आहार देण्यात येणार आहे. तशा सूचना राज्य शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी शासनास सादर केली आहे. सदरील अहवालानुसार सुमारे १ हजारावर शाळांतील १ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहार पुरविला जाणार आहे. 

दुध, अंडी अन् फळेही देणारविद्यार्थ्यांना नियमित पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारासोबतच उन्हाळी सुटीमध्ये दूध, अंडी आणि फळेही देण्यात येणार आहेत, असे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. सुटीच्या काळात विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. सदरील कामांमध्ये कुचराई झाल्यास दोषींवर कारवाई करण्याबाबतही सरकारचे निर्देश आहेत.

टॅग्स :Usmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीdroughtदुष्काळOsmanabadउस्मानाबाद