नवीन २९ आयुष्यमान रुग्णालये उभारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST2021-08-01T04:29:46+5:302021-08-01T04:29:46+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नवीन २९ आयुष्यमान रुग्णालये, रुग्णालयांसाठी आवश्यक असणारी उपकरणे याबरोबरच कर्मचाऱ्यांना निवासाच्या संदर्भात खासदार ...

नवीन २९ आयुष्यमान रुग्णालये उभारण्याची गरज
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नवीन २९ आयुष्यमान रुग्णालये, रुग्णालयांसाठी आवश्यक असणारी उपकरणे याबरोबरच कर्मचाऱ्यांना निवासाच्या संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची नवी दिल्ली येथील कार्यालयात भेट घेऊन विनंती केली.
उस्मानाबाद जिल्हा हा भारत सरकारने घोषित केलेल्या जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत आहे. जिल्ह्यात आरोग्याची गैरसोय होत असून, या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने जिल्ह्यात नवीन २९ आयुष्यमान रुग्णालये स्थापन करावीत. रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसह कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आवश्यक असून, त्या सर्व इमारती करण्यासाठी १५४५३.५४ लक्ष रुपये आवश्यक निधी न देता सन २०२१-२२ मध्ये २०८८.४६ लक्ष रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. ती फार कमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्याची गैरसोय कमी करण्यासाठी अधिकचा निधी जिल्ह्यास देण्यात यावा, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या निवेदनात केली आहे.